वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याच देशाविरोधात असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडू शकतात. इम्रान यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानसाठी परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. देश कधीही दिवाळखोरीत निघू शकतो. यानंतर देशाची अण्वस्त्रे हिसकावून घेतली जाऊ शकतात. भारताच्या थिंक टँकने पाकिस्तानचे 3 तुकडे करण्याची तयारी केली आहे.Imran Khan’s prediction Former Pakistani PM says India will divide Pakistan into 3 parts, nuclear weapons will also be snatched
खान यांचे हे विधान सरसकट देशद्रोह आहे आणि आताही त्यांच्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर ते असे नुकसान करतील, ज्याची भरपाई पुन्हा होणार नाही, असे पाकिस्तानी राजकीय जाणकारांचे मत आहे.
सैन्याला धमकी
ज्या लष्कराने 2018 मध्ये इम्रान यांना सत्तेत आणले, तीच सेना आता त्यांची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. ‘बोल टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत, ज्याला त्यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे मुखपत्र म्हटले जाते, खान म्हणाले – यावेळी सर्वात मोठी गरज निवडणुकीची आहे. पाकिस्तानची स्थिती भयावह आहे. रुपयाचे मूल्य घसरत आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. याचा सर्वाधिक फटका लष्कराला बसणार आहे. युक्रेनचे जे झाले तेच आमच्याशी केले जाईल. अण्वस्त्रे हिसकावून घेतली जातील. पाकिस्तानचे तीन तुकडे होतील, असे मी लेखी देत आहे. भारतात बसलेले थिंक टँक हे कारस्थान रचत आहेत.
खानकडून लष्करावर दबाव
पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार इम्रान शफकत यांच्या म्हणण्यानुसार – इम्रान यांना लष्करावर दबाव आणून त्यांना आपल्या बाजूने करायचे आहे. त्यासाठी ते देशच पणाला लावत आहेत. आताही त्यांना रोखले नाही, तर पाकिस्तानचे कधीच भरून निघू शकणार नाही, असे नुकसान होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App