वृत्तसंस्था
नवी दिल्ली : यंदाचा हा मार्च महिना देशाच्या इतिहासात दुसरा सर्वात तप्त महिना ठरला आहे. दरम्यान, राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम २ एप्रिलपर्यंत राहील, असा अंदाज असून पुढेही काही दिवस तापमानात वाढ राहील. This March is in the second hottest month in the history of the country
उत्तर आणि पश्चिम भारताकडून गरम आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे उष्णता राज्यात वाढली आहे. राज्यात गुरुवारी चंद्रपूरला सर्वाधिक ४४ अंश तर मालेगावी ४३.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. पश्चिम, उत्तर आणि मध्य भारतात सर्वच भागांत म्हणजे राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांत तापमान सरासरीपेक्षा ५ ते ८ अंशाने अधिक राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App