केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कर्नाटकातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, इस्लाममध्ये अशी अनेक प्रकरणे आहेत, जेव्हा महिलांनी हिजाब घालण्यास नकार दिला होता. Hijab Controversy Kerala Governor Arif Mohammad Khan tells the story of a woman who refused to wear hijab
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कर्नाटकातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, इस्लाममध्ये अशी अनेक प्रकरणे आहेत, जेव्हा महिलांनी हिजाब घालण्यास नकार दिला होता.
आरिफ मोहम्मद खान म्हणाले, निहित स्वार्थासाठी महिलांना अंधकारमय युगात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिजाब हा इस्लामचा अंगभूत भाग नाही, असे ते म्हणाले. 1986 मध्ये सरकार कट्टरवाद्यांच्या दबावाला बळी पडले, पण हे सरकार दबावापुढे झुकणार नाही.
गव्हर्नर मोहम्मद आरिफ खान म्हणाले, विद्यार्थ्यांना माझा सल्ला आहे की वर्गात जाऊन अभ्यास करा. जीवनात चांगले काम करण्यासाठी येथे उत्तम वातावरण मिळते. केरळचे राज्यपाल म्हणाले, मला पाकिस्तानच्या वक्तव्यावर भाष्य करायचे नाही. त्याचवेळी मलालाच्या याप्रकरणी प्रतिक्रियेवर ते म्हणाले, कदाचित तिला चुकीची माहिती देण्यात आली असावी. भारतात कुठेही हिजाबवर बंदी नाही. काही संस्थांचे नियम आहेत जे पाळावे लागतात.
आरिफ मोहम्मद खान यांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी पैगंबर मुहम्मद यांची नातेवाईक असल्याचं सांगणाऱ्या एका महिलेची कहाणीही सांगितली. ते म्हणाले, “मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. पैगंबरांच्या घरात वाढलेली एक तरुण मुलगी पैगंबरांच्या पत्नीची भाची होती. ती सुंदर होती. इतिहास हेच सांगतो. हे वाचा. मध्ययुगीन काळात महिलेच्या पती कुफाचे तत्कालीन राज्यपाल होते, तिला हिजाब न घातल्याबद्दल फटकारले गेले.”
आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले की, यानंतर महिला म्हणाली, देवाने तिला सुंदर बनवले आहे आणि सर्वशक्तिमानाने तिच्यावर सौंदर्याचा शिक्का मारला आहे. म्हणूनच लोकांनी माझे सौंदर्य पाहावे आणि माझ्या सौंदर्यात देवाची कृपा पाहावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी देवाचे आभार मानावे. केरळचे राज्यपाल म्हणाले, पहिल्या पिढीतील महिलांनी अशा प्रकारचा व्यवहार केला आहे, मला एवढेच सांगायचे आहे.
कर्नाटक सरकारने कर्नाटक शिक्षण कायदा-1983 चे कलम 133 राज्यात लागू केले आहे. त्यामुळे आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निश्चित गणवेश परिधान केला जाईल, खासगी शाळांनाही स्वतःचा गणवेश निवडता येईल. परंतु मुस्लिम विद्यार्थिनी मात्र हिजाब घालण्याचे समर्थन करत असून शालेय गणवेशाला नकार देत आहेत. यावरूनच देशभरात वादाची स्थिती निर्माण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App