प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लुकलुकणारे दिवे, दारापुढे कंदील, सुबक रांगोळी, फराळ, रोषणाई करून देशभर मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते.Diwali Special: Moment of Narak Chaturdashi and Lakshmi Puja
नरक चतुर्दशी
भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. पहाटे लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून स्नान केले जाते. यानंतर कारीट फोडून कुटुंबासमवेत एकत्र बसून दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला जातो. शुभ मुहूर्त : पहाटे ५:०३ ते ६:३८
लक्ष्मीपूजन
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. अश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. यंदा लक्ष्मी पूजन हे ४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत आहे.
असे करावे लक्ष्मी पूजन
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App