विशेष प्रतिनिधी
त्रिपुरा : आसाम राज्यातील माल वाहतूक आणि सीमावर्ती भागात अधिक वेगाने पोचण्यासाठी राज्यातील 27 महामार्ग प्रकल्पाला चालना दिली जाईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. work-on-27-highway-projects-in-assam-gets-going
राज्यातील महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी गडकरी बोलत होते. प्रकल्प 2 हजार 366 कोटींचा असून 439 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहान आणि राज्यातील पायाभूत सुविधाना अधिक बळ मिळणार आहे. तसेच रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने शेतमाल वाहतुक गतीने होईल, असे गडकरी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App