मायदेशात आणण्यासाठी मोदींचे चार मंत्री सज्ज…
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे रोमानिया आणि मोलदोव्हा, किरने रिजीजू यांच्याकडे स्लोव्हाकिया, हरदीप पुरी यांच्याकडे हंगेरी आणि व्ही. के. सिंह यांच्याकडे पोलंडची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस.हजारो विदेशी नागरिक युक्रेन मध्ये अडकले आहेत . भारतासह अमेरिका, जर्मनी , फ्रान्स आणि चीनचे देखील नागरिक युक्रेन मध्ये आहेत .या सर्व देशात आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यात भारत म्हणजेच मोदी सरकार आघाडीवर आहे .आतोनात प्रयत्न करून पंतप्रधान मोदी आपल्या नागरिकांना मायदेशात आणत आहेत .आज युक्रेन मध्ये अडकलेल्या आणखी २५० जणांना घेऊन सहावे विमान दिल्लीत आले आहे .UKRAIN-INDIA: India leads expulsion of its citizens from Ukraine; The benefits of Modi’s foreign policy and political contacts; entry into Poland without a visa
भारत युक्रेनमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत असून, भारतीय नागरिकांना परत आणण्यात कोणतीही कसर सोडली जात नाहीये. युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांशी वाढलेल्या राजनैतिक संपर्काचा उपयोग करून, आपले नागरिक सुरक्षित मायदेशी कसे परततील यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.
Poland is allowing to enter without any visa all Indian students who escape from Russian aggression in Ukraine. — Adam Burakowski (@Adam_Burakowski) February 27, 2022
Poland is allowing to enter without any visa all Indian students who escape from Russian aggression in Ukraine.
— Adam Burakowski (@Adam_Burakowski) February 27, 2022
आज पोलंडने जाहीर केले की युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीयांना आता व्हिसाची आवश्यकता भासणार नाही.हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे .मोदींच्या विदेश दौऱ्यांचा त्यांच्या विदेशनितीचा हा फायदा म्हणता येईल.
युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांशी मोदींनी प्रस्थापित केलेल्या राजनैतिक संबंधांमुळे आज त्याच देशातून भारतीयांना मायदेशात परत आणण्यात येत आहे.पोलंड-यूक्रेनवरील shehyni-medkya सीमेवरील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येत आहे.
दरम्यान आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.थेट युद्धजन्य युक्रेनच्या शेजारी युरोपीयन देशांमध्ये मोदी सरकारचे चार मंत्री जाणार आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्याच्या मोहिमेत समन्वयक म्हणून या सर्व मंत्र्यांना नेमण्यात आले आहे. हे मंत्री यानुसार भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
या मंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली. यानंतर युक्रेनच्या सीमावर्ती देशात केंद्रीय मंत्र्यांनी जाऊन तेथील बचाव कार्याचा समन्वय करण्याचा निर्णय झाला. मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजीजू आणि व्ही. के. सिंह या चार मंत्र्यांचा यात समावेश आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे रोमानिया आणि मोलदोव्हा, किरने रिजीजू यांच्याकडे स्लोव्हाकिया, हरदीप पुरी यांच्याकडे हंगेरी आणि व्ही. के. सिंह यांच्याकडे पोलंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व मंत्री जबाबदारी दिलेल्या देशांमधील प्रशासनाच्या संपर्कात राहून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत
दुसरीकडे इतर देश युद्धाच्या तावडीतून त्यांच्या नागरिकांना वाचवण्याच्या बाबतीत काय करत आहेत पाहा …
चीन
अंदाजे ६००० चिनी नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत माहिती बीजिंगने आपल्या नागरिकांसाठी चार्टर्ड विमानाची घोषणा केली. मात्र कीव सोडणाऱ्या त्यांच्या नागरिकांना चिनी ध्वज सारखी ओळख चिन्हे दाखवण्याची सक्ती केली आहे. तथापि, चीनने आपली निर्वासन योजना पुढे ढकलली आहे तर भारताचे ऑपरेशन गंगा युद्धपातळीवर सुरू आहे.
अमेरिका
अंदाजे ९०० कर्मचारी युद्धग्रस्त देशात अडकले असताना, वॉशिंग्टन डीसीने जाहीर केले की ते यूएस नागरिकांना बाहेर काढू शकणार नाही.आम्ही यूएस नागरिकांना मार्ग आणि जोखीम विचारात घेऊन सुरक्षित वाटल्यास खाजगी पर्यायांद्वारे आत्ताच निघून येण्याचे आवाहन करतो. अमेरिकन दूतावासाने असे ट्विट केले आहे.यूएस दूतावासाने संवादासाठी ऑनलाइन फॉर्म आणि स्थानिक क्रमांक देखील जारी केले.
युनायटेड किंगडम
रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला करण्याच्या काही दिवस आधी, ब्रिटीश दूतावासाने एक परिपत्रक जारी केले होते की ते युद्धग्रस्त देशात कॉन्सुलर ऍक्सेस प्रदान करण्यास सक्षम राहणार नाहीत आणि ब्रिटिश नागरिकांनी या परिस्थितीत बाहेर काढण्यासाठी मदतीची अपेक्षा करू नये. .
जर्मनी
जर्मन सरकारनेही आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याची सूचना केली कारण निर्वासन शक्य नाही. बर्लिनने आपला दूतावास बंद केला आहे, परंतु भारतीय दूतावास अजूनही कार्यरत आहे.
इजिप्त
युक्रेनमधील इजिप्शियन समुदायाच्या प्रमुखाने सांगितले होते की इजिप्शियन सरकार युक्रेनमधील आपल्या समकक्षांशी समन्वय साधत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी दूतावासाकडे मदतीसाठी हाक मारली आहे. काहींनी प्रकरणे स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि सीमा ओलांडून पोलंडमध्ये गेली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App