विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती साजरी होत आहे. अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.त्यांनी तमाम भारतीयांना मराठीत एक संदेश देखील दिला आहे .SHIVJAYANTI: ‘We are determined to fulfill the dream of Chhatrapati Shivaji Maharaj’! Prime Minister Modi’s love for Shiv … message in Marathi … posted a special photo .
पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांना वंदन करतानाचा एक खास फोटो ट्विट केला आहे. छत्रपती शिवरायांचं कार्य हे कायम प्रेरणा देणारं आहे, मी त्यांना नमन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/alPjOrLdT4 — Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/alPjOrLdT4
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या ठिकाणी साजरी केली जाते आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाचं वातवरण आहे. औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 61 फुटी पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. शुक्रवारी रात्री 12 वाजता म्हणजेच 19 फेब्रुवारी ही तारीख लागल्यानंतर हा सोहळा पार पडला.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं. औरंगाबादच्या क्रांती चौकात हातात भगवे झेंडे घेऊन असंख्य कार्यकर्ते जमले होते. औरंगाबादचा क्रांती चौक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी क्रांतीचौक दुमदुमला होता. ढोलताशांचा गजर, आतशबाजी, लेझर शो अशा थाटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App