विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहारच्या स्मृती प्रित्यर्थ मोठी घोषणा केली. १४ ऑगस्ट हा दिवस देशात Partition Horrors Remembrance Day अर्थात फाळणी भय स्मृतीदिन म्हणून पाळण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.Partition Horrors Remembrance Day! Modi’s announcement! August 14 will be observed as Partition Horrors Remembrance Day
देश के बंटवारे के दर्द को कभी भुलाया नहीं जा सकता। नफरत और हिंसा की वजह से हमारे लाखों बहनों और भाइयों को विस्थापित होना पड़ा और अपनी जान तक गंवानी पड़ी। उन लोगों के संघर्ष और बलिदान की याद में 14 अगस्त को 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' के तौर पर मनाने का निर्णय लिया गया है। — Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
देश के बंटवारे के दर्द को कभी भुलाया नहीं जा सकता। नफरत और हिंसा की वजह से हमारे लाखों बहनों और भाइयों को विस्थापित होना पड़ा और अपनी जान तक गंवानी पड़ी। उन लोगों के संघर्ष और बलिदान की याद में 14 अगस्त को 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' के तौर पर मनाने का निर्णय लिया गया है।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरू आहे. उद्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारत-पाकिस्तान फाळणीवेळी झालेल्या अमानुष नरसंहारच्या स्मृतींना उजाळा दिला.
‘देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसेमुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना विस्थापित व्हावं लागलं. तर अनेकांना जीवही गमवावे लागले. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ देशात १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी भय स्मृती दिन (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
‘फाळणी भय स्मृती (Partition Horrors Remembrance Day) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि दुष्प्रवृत्तीचं विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर यातून एकात्मता, सामाजिक सद्भावना आणि माणसांप्रतीची संवेदनशीलतेची भावनाही वाढीस लागेल’, अशा भावना मोदी यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.
मोदी म्हणतात…
‘कोणत्याही राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी इतिहास केवळ एक रंग असत नाही. अशा काही गोष्टी असतील ज्या चांगल्या घडल्या आणि काही वेदनादायी स्मृतीही असतील. भूतकाळातील काही गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात, तर वेदना आणि दुःखदायी आठवणी आपल्याला इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची शिकवण देतात’, असं मोदी म्हणाले.
‘फाळणी आणि फाळणीला कारणीभूत ठरलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. फाळणीनंतर सामाजिक भेदभावाचं राजकारण, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींनी मिळवलेलं वर्चस्व आणि लोकांचं नुकसान होत असताना बघ्याची भूमिका घेऊन उभं राहण… अशी परिस्थिती पुन्हा कधीही येऊ नये’, असं मोदी म्हणाले.
‘असं पुन्हा होणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी हे लक्षात ठेवणं आणि त्यातून योग्य धडा घेणं महत्त्वाचं आहे. कारण जे लोग इतिहासातून बोध घेत नाहीत, त्यांच्याकडून याची पुनरावृत्ती होते. त्यामुळे या फाळणी भय स्मृति दिनानिमित्त आपण संकल्प करूया की, अशी परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होणार नाही आणि एका आवाजात म्हणा की पुन्हा कधीच नाही’, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App