विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवार ठाकरे सरकारचा उफराटा आणि हलगर्जीपणाचा कळस दाखविणारा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्यांची परस्परच मार्च महिन्यात हकालपट्टी केली गेली, पण त्या सहा सदस्यांना कळविले मात्र तब्बल आठ महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर मध्ये… एवढेच नव्हे तर दस्तुरखुद्द आयोगालाही ही आपल्या सदस्यांना हटविलयाची माहिती नोव्हेंबरमधेच मिळाली. Maharashtra Women commission members removed in March
फडणवीस सरकारच्या या कालावधीत नियुक्त झालेल्या सहा सदस्यांवर पवार- ठाकरे सरकारने केलेल्या या कारवाईने आणि त्याबद्दल खुद्द आयोगालाही अंधारात ठेवण्याच्या कृतीने महिला व बाल विकास मंत्रालयाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. रिदा रशिद, रोहिणी नायडू, ज्योती भोये, चंद्रिका चव्हाण, अनुसया गुप्ता आणि गयाताई कराड या सदस्यांना ९ नोव्हेंबरला आयोगाने पाठविलेल्या पत्रानेच कळाले की आपले सदस्यत्व आठ महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च मध्येच संपले आहे. एवढेच नव्हे तर या सदस्यांकडून एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान दिलेले मानधनही परत करण्याचा आदेश त्यांना दिला गेला. Maharashtra Women commission members removed in March
या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे आणि मानधनाची अठरा हजार रुपये रक्कमही सरकारला परत केली आहे. “बाजू मांडण्याची साधी संधीही न देता परस्पर केलेली आणि तब्बल आठ महिने लपवून ठेवलेली आपल्या नेतृत्वाखालील राज्य सरकारची ही कृती पूर्णपणे अनैतिक, बेकायदेशीर आणि नियमबाह्य आहे. त्यास राजकीय सूडबुद्धीचा वास येत आहे,” असे पत्रात म्हटले आहे.
कायद्याने बंधनकारक असताना बाजू मांडण्याची संधीही न देता आठ महिन्यांपूर्वीच महिला आयोगातून बाजूला केलेले हे सहा सदस्य…
या सहा सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र पुढील प्रमाणे :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App