कलम ३0 आणि 35A रद्द केल्यानंतर, बदललेल्या परिस्थितीमुळे आणि सुरक्षा दलांच्या कडक कारवाईमुळे स्थानिक तरुणांचा दहशतवादाबद्दल भ्रमनिरास होत आहे.Jammu and Kashmir: Pakistan wants terrorism to survive in the Valley
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर युद्धबंदीद्वारे आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवायचे आहे. कलम ३0 आणि 35A रद्द केल्यानंतर, बदललेल्या परिस्थितीमुळे आणि सुरक्षा दलांच्या कडक कारवाईमुळे स्थानिक तरुणांचा दहशतवादाबद्दल भ्रमनिरास होत आहे.
यामुळेच दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांची भरती कमी झाली आहे. असे असूनही, पाकिस्तान आता कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या नागरिकांना दहशतवादी म्हणून पाठवत आहे. सोमवारी नरकोटमध्ये मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक मोहम्मद अफजल, पाकिस्तानी नागरिक आहे.
सोमवारी नरकोटमध्ये लष्कराने मारलेल्या एका दहशतवाद्याकडून पाकिस्तानचे राष्ट्रीय ओळखपत्र सापडले आहे. यामध्ये त्याची ओळख मोहम्मद अक्रम पाकिस्तानचा रहिवासी असल्याची नोंद आहे.
त्याच्यासोबत 13370 रुपयांचे पाकिस्तानी चलनही त्याच्याकडून सापडले आहे. ज्यामध्ये हजार, पाचशे आणि शंभरच्या नोटांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये असलेल्या एका दुकानाचे व्हिजिटिंग कार्डही सापडले आहे.
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत काही काळ चकमकीदरम्यान अनेक दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आत्मसमर्पण केले त्याबद्दल पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय खूप चिंतित आहे आणि आता ती आपल्या नागरिकांना दहशतवादी म्हणून पाठवण्यात व्यस्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App