केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी ट्वीटद्वारे दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील ट्रक चालकांच्या दृष्टिने महत्त्वाचा निर्णय घेत मोदी सरकारने N2 आणि N3 च्या ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा अर्थात एसी बसवणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने यासाठी अधिसूचनेचा मसुदा मंजूरही केला आहे. या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता ट्रकमालकांना ट्रकच्या केबिनमध्ये एसी बसवणे बंधनकारक असणार आहे. Installation of AC in truck cabins now mandatory draft notification approved by Centre
नितीन गडकरी यांनी या प्रकरणी ट्विट केले की, N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्याच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यात ट्रक चालकांची महत्त्वाची भूमिका आहे. हा निर्णय ट्रक चालकांना आरामदायक कामाची परिस्थिती प्रदान करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारेल आणि चालकांच्या थकव्याच्या समस्येचे निराकरण होईल.
२०२५ पासून अनिवार्य
२०२५ पासून सर्व ट्रक केबिन अनिवार्यपणे वातानुकूलित कराव्या लागतील, यामुळे सरकारच्या मसुद्यानुसार, जे चालक अनेकदा ११-१२ तास सलग वाहन चालवतात त्यांना अत्यंत आवश्यक असणारा आराम मिळेल. खडतर कामाची परिस्थिती आणि रस्त्यावर दीर्घ तास प्रवास यामुळे वाहनचालकांचा थकवा हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
Approved the draft notification to mandate the installation of air-conditioning systems in the cabins of trucks belonging to categories N2 and N3. Truck drivers play a crucial role in ensuring road safety. This decision marks a significant milestone in providing comfortable… — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) July 6, 2023
Approved the draft notification to mandate the installation of air-conditioning systems in the cabins of trucks belonging to categories N2 and N3.
Truck drivers play a crucial role in ensuring road safety. This decision marks a significant milestone in providing comfortable…
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) July 6, 2023
व्होल्वो आणि स्कॅनिया यांसारख्या जागतिक कंपन्यांनी निर्माण केलेले हाय-एंड ट्रक आधीच वातानुकूलित केबिनसह आलेले असताना, अनेक वर्षापासून हा मुद्दा चर्चेत होता, मात्र बहुतांश भारतीय ट्रक कंपन्यांनी या क्षेत्रात पावले उचलली नव्हती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App