विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संभाव्य जागतिक महामंदीचा धोका लक्षात घेऊन देशातील उद्योगक्षेत्र दिवाळखोरीत जाऊ नये, बेरोजगारीचा टक्का आटोक्याबाहेर जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने उद्योगक्षेत्रासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २ – ३% रकमेचे आर्थिक पँकेज द्यावे, अशी आग्रही मागणी सीआयआय आणि असोचाम या अग्रगण्य संस्थांनी केली आहे. सरकारने नुकतेच जाहीर केलेले १ लाख ७० हजार कोटींचे पँकेज सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या .०९% आहे. उद्योगक्षेत्रापुढील भविष्यातील आव्हानांचा पाढा या दोन्ही संघटनानी सरकारला सादर केलेल्या अभ्यास अहवालात वाचण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App