राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2020
का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.
समझने वालों को इशारा काफी है!
या रामलाल यांचे स्मरण होण्यामागे राऊत यांना काही सुचवायचे आहे का, असा प्रश्न निर्णाण होतो आहे. केवळ वीस टक्के आमदारांचे बहुमत असलेले अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे तर राज्यपालांच्या मनात नाही ना, अशी शंका राऊत यांना येते आहे. त्यामुळे समझने वालोंको इशारा काफी है, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा अजित पवारांकडे तर बोट दाखवले नाही ना, असेही बोलले जात आहे. अजित पवार आणि भाजप यांच्यातील छुपी युती लपून राहिलेली नव्हती. पहाटेच्या अंधारात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होतीच. त्यामुळे अजित पवार हे आता महाराष्ट्राचे एन. भास्कर राव बनणार का, या प्रश्नाचे कोडे राऊत यांना पडले असावे
Array