विशेष प्रतिनिधी
पुणे : गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वर येथे जाण्याची परवानगी देणारे पत्र दिल्याचे मान्य केले आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. हे पत्र देण्यासाठी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. सदर अहवाल सार्वजनिक केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले आहे. या पार्श्वभूमीवर ’मानवतेची’ व्याख्याच बदलावी लागेल, असा टोला ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी लगावला आहे.
कुंभार यांनी सोशल मीडियात देशमुखांवर टीका करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देशमुखांच्या विरोधात सडकून टीका केली आहे. लॉकडाऊमुळे अनेक सर्वसामान्य घरांमधल्या आई-लेकराची, पती-पत्नीची, भावाबहिणींची ताटातूट झाली आहे. एवढेच नव्हे तर गंभीर आजारपण, वृद्धत्व, एकाकीपणा याच्याशी लढणाऱ्या सर्वसामान्यांनाही सरकारी परवान्यांचा जाच होतो आहे. या स्थितीत राजकीय लागेबांधे असणाऱ्या आणि श्रीमंतांना मात्र लॉकडाऊनमध्येही विनासायास कुठूनही, कुठेही जाता येत असल्याची खंत नेटकऱ्यांनी केली आहे.
कुंभार यांनी उपहासपूर्ण शैलीत लिहीलं आहे – एक बरं झालं ‘ते’ पत्र देण्यासाठी ग़ुप्तांवर कोणताही राजकीय दबाव नव्हता हे अहवाल जाहिर होण्याआधीच समजलं. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री रवीना टंडन यांनी गुप्ता यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप खोटा ठरला. अमिताभ गुप्ता यांच्यावर आरोप झाल्या झाल्या टंडन ताईंनी ‘अमिताभ गुप्ता यांना बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. ते पत्र देण्यासाठी दबाव आणला गेला आहे. वरिष्ठांनी आपल्या बोलवत्या धन्याला वाचवण्यासाठी ‘अशा गरीब’ माणसाचा बळी दिला आहे. गुप्ता यांचा इतिहास आणि निर्णय घ्या’ अशा अर्थाचे ट्वीट केले होते. गुप्ता यांचे बॉलिवूडशी असलेले संबध आणि त्यांचा पेज ३ पार्ट्यांमधील सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय होता. टंडनताईंच्या ट्वीटने त्याला दुजोरा मिळाला होता . असो.
सदर अहवालातून खालील प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करत कुंभार यांनी नेमके प्रश्न गृहखात्यासमोर उपस्थित केले आहेत. ते असे –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App