वृत्तसंस्था
मुंबई : मार्चच्या 24 तारखेला जाहीर झालेला लॉकडाऊन येत्या 17 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. चीनी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन उपयुक्त ठरत असल्याचे खंडप्राय भारतात दिसून आले आहे. त्याचवेळी केंद्रातल्या सरकारने सर्व राज्यांना चीनी विषाणू बाधित लोकंचा शोध घेण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या घेण्यासाठीही प्रोत्साहित केले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 9 लाख 76 हजार 363 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
चीनी विषाणूचा संसर्ग शोधणाऱ्या देशातील सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात 1 लाख 53 हजार इतक्या झाल्या आहेत. परंतु लोकसन्ख्येच्या प्रमाणात विचार करता सर्वाधिक चाचण्या तामिळनाडुत झाल्या आहेत. 485 इतके सर्वाधिक कोरोनाबळी मात्र महाराष्ट्रातले आहेत. ही आकडेवारी 1 मेपर्यंतची आहे.
देशभरातील चाचण्यांचा आढावा पुढीलप्रमाणे –
सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी चीनी विषाणूच्या समुदायाची तपासणी करण्यासाठी व्यापक चाचण्या करण्याचे आवाहन केले आहे. आयसीएमआरने इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराने ग्रस्त तसेच ताप, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक आदी लक्षणे आढळणाऱ्यांची चाचणी घेण्याची सूचना केली आहे. तसेच हॉटस्पॉट्स / क्लस्टर्समध्ये तपासणीचा वेग वाढवण्याची सूचना केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App