विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना महंमद साद याची हेकडी काढून त्याला सरळ करण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट होत आहे. निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातच्या मरकजमधील गंभीर परिस्थितीची माहिती १८ मार्चलाच गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून देण्यात आली होती. पोलिसांनी मरकज परिसर खाली करण्याचे प्रयत्न करून पाहिले परंतू, महंमद सादने त्यांना अजिबात दाद दिली नाही. त्याने अडेलतट्टू धोरण कायम ठेवले होते. शेवटी अमित शहा यांनी अजित डोवाल यांना अँक्शन मोडमध्ये आणले.
त्यांनी २८, २९ मार्चच्या मध्यरात्री मरकजमध्ये जाऊन महंमद सादची भेट घेतली. त्याची “समजूत” काढली आणि मरकज खाली करण्याच्या प्रक्रियेला वेग आणला. महंमद सादची गुर्मी आधी एवढी वाढली होती की त्याने मरकजमधील लोकांची कोविड १९ ची चाचणी करण्यासही नकार दिला होता. मरकजमधून बाहेरच्या राज्यात गेलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर मरकजमधील लोकांची चाचणी करावी, यासाठी पोलिसांनी दबाव वाढवला होता. पण महंमद साद मानायला तयार नव्हता. मरकजमध्ये २१६ परदेशी नागरिक होते. यात इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेशाचे नागरिक होते. त्यांनी टूरिस्ट व्हिसावर भारतात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे मिशनरी व्हिसा नाही. तरीही हे लोक व मरकजमधील अन्य परदेशी लोक भारतभर फिरत होते. जानेवारीपासून मार्चपर्यंत सुमारे २००० परदेशी नागरिक मरकजमध्ये राहून देशभर फिरत होते. त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू झाले आहे.
दिल्ली के 16 मस्जिदों से तब्लीगी जमात के लोगों को खोजा जा रहा है।दिल्ली पुलिस क्राइम ब्रांच का साथ ले रही है।UP के 19 ज़िलों में ढूँढ रहे है।ऐसा ही देश के अनेकों राज्यों में क्वारंटाइन के लिए लाना पड़ा रहा है।खबर फैलने के बाद भी खुद सामने नहीं आ रहे।इसे फँसे होना नहीं कहा जाता।— Anjana Om Kashyap (@anjanaomkashyap) April 1, 2020
दिल्ली के 16 मस्जिदों से तब्लीगी जमात के लोगों को खोजा जा रहा है।दिल्ली पुलिस क्राइम ब्रांच का साथ ले रही है।UP के 19 ज़िलों में ढूँढ रहे है।ऐसा ही देश के अनेकों राज्यों में क्वारंटाइन के लिए लाना पड़ा रहा है।खबर फैलने के बाद भी खुद सामने नहीं आ रहे।इसे फँसे होना नहीं कहा जाता।
लॉकडाऊनच्या काळातही मरकजमधील कार्यक्रम बिनदिक्कतपणे सुरू होते. अजित डोवाल अँक्टीव मोडमध्ये आल्यावर मरकजमधील १५०० लोक काल दोन तासांमध्ये बाहेर काढण्यात आले. मरकरजमधील महंमद साद ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी अजित डोवाल यांनी देशातील प्रमुख मुस्लीम धर्मगुरूंशी “आपल्या पद्धतीने” संपर्क साधला होता. त्यामुळे मरकजवरील कारवाईनंतर त्या समूदायातून फारशी प्रतिकूल प्रतिक्रिया आली नाही. मौलाना महंमद साद कुटुंबीयांसह फरार झाला. फक्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तबलिगी जमातच्या समर्थनासाठी पुढे आली. पण बहुतेक उलेमा, मौलानांनी तबलिगी जमातवर टीकाच केली. हा डोवाल इफेक्ट असल्याचे मानले जात आहे. डोवाल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तबलिगी जमातने १६७ लोकांच्या चाचणीला आणि त्यांना क्वारंटाइन करायला मान्यता दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App