विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या मृत्यूबाबत राहूल गांधी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इटालीयन भाषेत उत्तर दिले आहे. या राजकुमारापाशी तेव्हाही मेंदू नव्हता, आजही नाही आणि नेहमीच नसेल, अशी टीका त्यांनी केलीआहे.Union Minister Giriraj Singh’s reply to Rahul Gandhi’s remarks in Italian, said the prince did not have a brain then and will not always
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यूच झाले नसल्याचा दावा मोदी सरकारने मंगळवारी संसदेत लेखी उत्तरात केला आहे. यावर टीका करताना राहूल गांधी म्हणाले होते की, करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ ऑक्सिजनचाच अभाव नव्हता तर संवेदनशीलता आणि सत्याचाही अभाव होता आणि आताही आहे.
यावर टीका करताना गिरीराज सिंह म्हणाले, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची यादी राज्ये तयार करतात. जिथे जिथे काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, तिथून सुधारित यादी सादर करण्यास सांगावे. तोपर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूबाबत खोटे बोलणे बंद करावे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App