हरियाणाच्या सोनीपत येथील सिंघू सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर निहंग शीख आणि शेतकरी आंदोलनातहील नेत्यांमधील भांडण आता समोर आले आहे. शेतकरी आंदोलनातून निहंगांना हटवण्याची मागणी जोर धरत आहे. त्यानंतर निहंग जथेबंदींनी 27 ऑक्टोबर रोजी सिंघू सीमेवर किंवा महापंचायतीवर धार्मिक मेळावा बोलावला आहे. या बैठकीत जनमत चाचणीच्या आधारावर निर्णय घेतला जाईल की, त्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनातून माघार घ्यावी की नाही. यामध्ये, निहंगांवरील पोलीस कारवाईवरही चर्चा केली जाईल. Singhu border murder Voting in Mahapanchayat on 27 october on Nihang Sikhs to leave Farmers Protest Or Not
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणाच्या सोनीपत येथील सिंघू सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर निहंग शीख आणि शेतकरी आंदोलनातहील नेत्यांमधील भांडण आता समोर आले आहे. शेतकरी आंदोलनातून निहंगांना हटवण्याची मागणी जोर धरत आहे. त्यानंतर निहंग जथेबंदींनी 27 ऑक्टोबर रोजी सिंघू सीमेवर किंवा महापंचायतीवर धार्मिक मेळावा बोलावला आहे. या बैठकीत जनमत चाचणीच्या आधारावर निर्णय घेतला जाईल की, त्यांनी कृषी यद्यांच्या विरोधातील आंदोलनातून माघार घ्यावी की नाही. यामध्ये, निहंगांवरील पोलीस कारवाईवरही चर्चा केली जाईल.
सिंघू सीमेवर बसलेल्या निहंग जथेबंदीच्या प्रमुखांपैकी एक निहंग राजा राम सिंह यांनी सोमवारी शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एसकेएम नेते योगेंद्र यादव यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, योगेंद्र यादव यांना SKM ने डोक्यावर घेतले आहे, ते भाजप आणि RSSचे आहेत. ते म्हणाले की, या नेत्यांनी त्यांच्यासमोर येऊन उत्तर दाखवावे. संयुक्त किसान मोर्चाने संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्याशिवाय निहंगांना गुन्हेगार असल्यासारखे दूर केले. पोलिसांनी धर्माची बाब न समजून कारवाई सुरू केली आहे. राजा राम सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही ना धर्माबरोबर अपवित्रता सहन करणार आहोत ना कुणाचा मनमानी हस्तक्षेप. या सर्व बाबींवर 27 तारखेला निर्णय घेतला जाईल.
राजा राम सिंह म्हणाले की, 27 ऑक्टोबर रोजी सिंघू सीमेवर होणाऱ्या धार्मिक मेळाव्यात संत समाजातील सर्व लोक, विचारवंत आणि संगत उपस्थित राहील. त्या काळात संयुक्तपणे जो काही निर्णय घेतला जाईल, तो निहंग जथेबंदी स्वीकारतील. निहंग बाबा राजा राम सिंह म्हणाले, ‘आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी नाही. आम्ही जे केले ते आम्ही स्वीकारतो. आमच्या चार सिंहांना अटक झाली आहे, त्यांनी न्यायाधीशासमोर लखबीरला मारल्याची कबुली दिली आहे. आम्ही सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या संरक्षण आणि पाठिंब्यासाठी आलो होतो. निहंग सैन्याची स्थापना झाली, कारण जेव्हा जेव्हा शीख समुदायावर कोणतीही आपत्ती येईल तेव्हा हे सैन्य खंबीरपणे उभे राहील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App