कडक उन्हात महिला व मुलांना यावे लागले रस्त्यावर
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांची घरे बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती. Hindus who came from Pakistan are homeless again bulldozer on the houses after the order of Collector Tina Dabi
मात्र जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानंतर यूआयटी सहायक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची ही कारवाई करण्यात आली. अमर सागर परिसरात राहणार्या लोकांची घरे मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली, त्यामुळे कडक उन्हात महिला व मुलांना रस्त्यावर यावे लागले.
पाकिस्तानातील सरकारच्या दहशती आणि दडपशाहीतून सुटून कसे तरी भारतात आलेले हे लोक अमर सागरमध्ये दीर्घकाळ राहत होते, परंतु जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या आदेशानुसार त्यांची घरे पाडण्यात आली. प्रशासनाच्या या कृतीला या हिंदू कुटुंबातील महिलांनी विरोधही केला होता, मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्त घेऊन आलेल्या प्रशासनाच्या पथकाने त्यांची घरे पाडली. आता या कडाक्याच्या उन्हात या लोकांच्या डोक्यावर सावली नाही. रडून रडून महिलांची दुरवस्था झाली आहे, सामान रस्त्यावर विखुरले असून त्यांची काळजी घेणारे कोणी नाही.
जैसलमेर में पाकिस्तान से आए हिंदू शरणार्थियों के घरों पर बुलडोजर चलवाकर हिन्दू विरोधी कांग्रेस सरकार ने इंसानियत को किया तार – तार। गहलोत जी बताइए, इस भीषण गर्मी में बेबस, लाचार और असहाय निर्दोष हिंदू शरणार्थी कहाँ जाए? pic.twitter.com/8HpKuLvVs6 — Kailash Choudhary (मोदी का परिवार) (@KailashBaytu) May 17, 2023
जैसलमेर में पाकिस्तान से आए हिंदू शरणार्थियों के घरों पर बुलडोजर चलवाकर हिन्दू विरोधी कांग्रेस सरकार ने इंसानियत को किया तार – तार।
गहलोत जी बताइए, इस भीषण गर्मी में बेबस, लाचार और असहाय निर्दोष हिंदू शरणार्थी कहाँ जाए? pic.twitter.com/8HpKuLvVs6
— Kailash Choudhary (मोदी का परिवार) (@KailashBaytu) May 17, 2023
पाकिस्तानात छळलेले हिंदू मोठ्या संख्येने राजस्थानमधील सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत. सीमेपलीकडून छळ होऊन भारतात आलेल्या या हिंदूंची अवस्था इथेही फारशी चांगली नाही, पण तरीही त्यांच्या डोक्यावर छत आहे आणि किमान ते बिनधास्त आयुष्य जगत आहेत. मात्र, जैसलमेर प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या कारवाईने त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे. आता या कुटुंबांना ना डोक्यावर छत आहे, ना तात्पुरते स्वतःचे म्हणता येईल अशी जागा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App