वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर आता असा जिल्हा बनला आहे, जिथे ‘हर घर जल’ योजना 100 टक्के पूर्ण झाली आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी दिले जात आहे. जलशक्ती मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. यानंतर पंतप्रधान, केंद्रीय जलशक्ती मंत्री, मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करून बुरहानपूरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.Har Ghar Jal : Burhanpur became the first district in the country where water reached 100% households; PM Modi congratulated
जलशक्ती मंत्रालयाच्या पोर्टलवर जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा प्रत्येक घरात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असलेला पहिला प्रमाणित जिल्हा बनला आहे. या जिल्ह्यातील सर्व 254 ग्रामसभांनी ‘हर घर जल’ योजना सर्व घराघरांत पोहोचल्याचा ठराव संमत केल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. याशिवाय सर्व घराघरांत पोहोचल्याने आता एकही कुटुंब असे नाही ज्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही.
Congratulations to all citizens of Burhanpur. From just 37% households in August 2019 to 100% in less than three years, Burhanpur in Madhya Pradesh has become the first #HarGharJal certified district in the country. #HarGharJalUtsav pic.twitter.com/7Oeocd9byR — Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार) (@gssjodhpur) July 22, 2022
Congratulations to all citizens of Burhanpur.
From just 37% households in August 2019 to 100% in less than three years, Burhanpur in Madhya Pradesh has become the first #HarGharJal certified district in the country. #HarGharJalUtsav pic.twitter.com/7Oeocd9byR
— Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार) (@gssjodhpur) July 22, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या उद्देशाने ‘हर घर जल’ योजना सुरू केली होती. जवळपास तीन वर्षांनंतर जलशक्ती मंत्रालयाने दावा केला आहे की, मध्य प्रदेशातील एक असा जिल्हा आहे ज्यामध्ये ‘हर घर जल’ योजना 100 टक्के पूर्ण झाली आहे. हर घर जल योजनेंतर्गत पाणी देण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 15 ऑगस्ट 2019 पर्यंत केवळ 3 कोटी 23 लाख 62 हजार 838 कुटुंबांकडे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन होते. आता ही संख्या 9 कोटी 85 लाख 93 हजार 119 कुटुंबांवर पोहोचली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण 19 कोटी कुटुंबांपैकी निम्म्याहून अधिक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची जोडणी देण्यात आली आहे.
गोवा, तेलंगणा, अंदमान-निकोबार, पुद्दुचेरी, दादरा-नगर हवेली आणि हरियाणामध्ये हर घर जल योजनेने 100 टक्के उद्दिष्ट गाठले आहे, असे मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार. मात्र, या राज्यांतील सर्व जिल्हे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे ज्याने 100% पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठले आहे.
काय आहे हर घर जल मिशन?
मोदी सरकारने जल जीवन मिशन किंवा हर घर जल योजनेची घोषणा केली होती. 2024 पर्यंत ग्रामीण भारतातील सर्व घरांना घरगुती नळ जोडणीद्वारे स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेवर सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करत आहे.
Congratulations to my sisters and brothers of Burhanpur for this remarkable accomplishment. This would not have been possible without a collective spirit among the people and mission mode efforts by the JJM Team and the MP Government under @ChouhanShivraj Ji. https://t.co/QrYdVPMSEm — Narendra Modi (@narendramodi) July 22, 2022
Congratulations to my sisters and brothers of Burhanpur for this remarkable accomplishment. This would not have been possible without a collective spirit among the people and mission mode efforts by the JJM Team and the MP Government under @ChouhanShivraj Ji. https://t.co/QrYdVPMSEm
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2022
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बुरहानपूरच्या बंधू-भगिनींचे अभिनंदन, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि जोधपूरचे खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांनीही अभिनंदन करणारे ट्विट केले की, ऑगस्ट 2019 मध्ये, तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत केवळ 37 टक्के कुटुंबांवरून 100 टक्के, मध्य प्रदेशातील बुरहानपूर हा देशातील पहिला हर घर पाणी प्रमाणित जिल्हा बनला आहे.
या कामगिरीचा आज संपूर्ण मध्य प्रदेशला अभिमान आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश आतापर्यंत मध्यप्रदेशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी देण्याच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत 51 लाख 15 हजारांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. बुरहानपूरला भारत सरकारने हर घर जल प्रमाणित जिल्हा म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यातील सर्व 254 गावे “हर घर जल” प्रमाणित आहेत. आज संपूर्ण मध्य प्रदेशला या कामगिरीचा अभिमान आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App