भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता बातमी येत आहे की, श्रीलंकेतील किमान 19 नागरिक भारतात आले आहेत. हे सर्व श्रीलंकन तामिळ बोटीने जाफना आणि मन्नारमार्गे तामिळनाडूतील धनुषकोडी येथे पोहोचले.Economic crisis looms in Sri Lanka, 19 Sri Lankans flee the country to Tamil Nadu, seek asylum in India
वृत्तसंस्था
चेन्नई : भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता बातमी येत आहे की, श्रीलंकेतील किमान 19 नागरिक भारतात आले आहेत. हे सर्व श्रीलंकन तामिळ बोटीने जाफना आणि मन्नारमार्गे तामिळनाडूतील धनुषकोडी येथे पोहोचले.
भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितले की, श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. भीषण आर्थिक संकटामुळे तेथे राहणे कठीण झाले आहे. श्रीलंकेतील एका जोडप्याने दोन मुलांसह समुद्र पार करून शुक्रवारी भारतीय किनारपट्टी गाठली. आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह एकूण 39 लोक आश्रय घेण्यासाठी भारतात पोहोचले आहेत. 81 अब्ज डॉलरची श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर आहे. कर्जाच्या सापळ्यात अडकण्यापासून ते महागाईपर्यंत, श्रीलंकेतील अनेक अडचणींनी एकाच वेळी आर्थिक संकटाला जन्म दिला आहे.
अनेक आठवड्यांपासून जनतेचे आंदोलन
1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. अनेक तास वीजपुरवठा खंडित होणे, गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा याविरोधात देशातील नागरिक अनेक आठवड्यांपासून निदर्शने करत आहेत. देशवासी सतत राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि ‘गो होम गोटा’ म्हणत आहेत. आंदोलकांपैकी एकाने मीडियाला सांगितले की, ‘हा विनोद नाही. आमच्याकडे वीज, इंधन आणि औषधे नाहीत.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App