वृत्तसंस्था
नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ३० जूनपर्यंत लोकांना परदेशात जाता येणार नाही. नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) लागू केलेली बंदी एक महिन्यासाठी वाढविली आहे. गेल्या वर्षापासून भारतातून परदेशातील विमानसेवा बंदी आहे. कोरोना विषाणूमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे .डीजीसीएच्या या घोषणेनंतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत स्थगित ठेवण्यात येतील.DGCA extends ban on scheduled international commercial passenger flights until June 30
pic.twitter.com/IueesZFoiV — DGCA (@DGCAIndia) May 28, 2021
pic.twitter.com/IueesZFoiV
— DGCA (@DGCAIndia) May 28, 2021
इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.
२३ मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाउन अस्तित्त्वात आल्यापासून आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. परंतु मे २०२० पासून वंदे भारत मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. परदेशात अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरू करण्यात आले आणि अनेक देशांशी हवाई बबल करार देखील करण्यात आले. भारताने सध्या २७ देशांशी द्विपक्षीय हवाई बबल करार केला आहे .
एअर बबल करारानुसार दोन देशांमधील विशेष आंतरराष्ट्रीय विमान त्यांच्या प्रदेशांदरम्यान उड्डाण करू शकतात. तथापि, डीजीसीएने शुक्रवारी जाहीर केलेल्या आपल्या अधिकृत निवेदनात असेही म्हटले आहे की या निलंबनाचा आंतरराष्ट्रीय मालवाहू कामकाज आणि त्याद्वारे मंजूर झालेल्या उड्डाणांवर परिणाम होणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आंतरराष्ट्रीय पॅसेंजर विमानांवर निलंबनाबाबत हा निर्णय कोरोनाच्या दुसर्या लहरीच्या दरम्यान आला आहे.
डीजीसीएने नमूद केले आहे की एखाद्या प्रकरणात सक्षम प्राधिकरणाद्वारे निवडलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा परवानगी दिली जाऊ शकते. हे
नुकतेच, डीसीजीएने प्रवाशांना जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, प्रवाशांना विमानतळावर प्रवेश झाल्यापासून मास्क घालणे बंधनकारक असेल. प्रवाश्यांनी हवाई प्रवासादरम्यान शारीरिक अंतर आणि कोरोना मार्गदर्शकतत्त्वांचे पालन केले पाहिजे. नियमांचे उल्लंघन केले तर विमानातून बाहेर पाठवले जाईल. इतकेच नव्हे तर नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्यांना ‘उपद्रवी प्रवासी’ म्हणून घोषित केले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App