आंध्र प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे विध्वंस, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

Andhra Pradesh Flood death toll rise PM Modi assure state for help

Andhra Pradesh Flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 100 लोक बेपत्ता आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे जुनी 3 मजली इमारत कोसळून तीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. येथे बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही चारहून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. Andhra Pradesh Flood death toll rise PM Modi assure state for help


वृत्तसंस्था

हैदराबाद : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 100 लोक बेपत्ता आहेत. अनंतपूर जिल्ह्यातील कादिरी शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसामुळे जुनी 3 मजली इमारत कोसळून तीन मुले आणि एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. येथे बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही चारहून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून संततधार पावसाने कहर केला आहे. रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि एका दक्षिण किनारपट्टीच्या जिल्ह्यात २० सेमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहनची बस रामापुरममध्ये अडकली, त्यामुळे १२ जणांना जीव गमवावा लागला.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी बोलले आणि आंध्र प्रदेशातील काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थिती लक्षात घेऊन त्यांना सर्व शक्य केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या महापुरात किमान तीन जणांचा मृत्यू झाला, तर काही लोक त्यात वाहून गेल्याची भीती आहे.

शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी बोललो. सर्व शक्य केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले.” त्यांनी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेची कामना केली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे आणि चित्तूर आणि कडप्पा येथे अनेक वर्षांतील सर्वात भीषण पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथके बचाव आणि मदतकार्यात गुंतलेली आहेत.

Andhra Pradesh Flood death toll rise PM Modi assure state for help

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात