Sri Lanka in financial crisis : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याशी चर्चा केली आणि अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तपशीलवार आभासी बैठकीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छिमारांचा मुद्दा उपस्थित केला आणि मानवतावादी मदत म्हणून त्यांची लवकर सुटका करण्याचे आवाहन केले. India extends helping hand to Sri Lanka in financial crisis Jaishankar made many agreements
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याशी चर्चा केली आणि अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तपशीलवार आभासी बैठकीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छिमारांचा मुद्दा उपस्थित केला आणि मानवतावादी मदत म्हणून त्यांची लवकर सुटका करण्याचे आवाहन केले.
जयशंकर यांनी बैठकीनंतर ट्विट केले की, आम्ही श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांसोबत सविस्तर आभासी बैठक पूर्ण केली आहे. या बैठकीत ते म्हणाले की, भारत हा श्रीलंकेचा खंबीर आणि विश्वासार्ह भागीदार असेल. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पुढे आश्वासन दिले की भारत या गंभीर प्रसंगी श्रीलंकेला पाठिंबा देण्यासाठी इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसह पुढाकार घेईल. ऊर्जा सुरक्षेला हातभार लावणाऱ्या त्रिंकोमाली टँक फार्मच्या प्रगतीचे त्यांनी स्वागत केले.
बैठकीदरम्यान, 2965 कोटींच्या चलनाची अदलाबदल आणि 3705 कोटींचे पेमेंट पुढे ढकलण्याबाबत करार झाला. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंसाठी 7400 कोटी रुपयांच्या मुदत कर्ज सुविधा आणि इंधन खरेदीसाठी 3700 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधेवर चर्चा करण्यात आली.
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये नवी दिल्लीला भेट देऊन आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या श्रीलंकेला मदत करण्याचे आवाहन केले होते.
श्रीलंकेत जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे संकट आहे. अशा परिस्थितीत या राष्ट्राने भारताकडून जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर अजित निवार्ड काब्राल म्हणाले की, श्रीलंका त्याच्या कर्जाच्या पेमेंटची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून चीनकडून आणखी एका कर्जासाठी वाटाघाटी करत आहे. मात्र, कर्जाची रक्कम निश्चित व्हायची आहे.
श्रीलंकन बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, वस्तू आयात करण्यासाठी श्रीलंका भारताशी एक अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी बोलणी करत आहे. यामुळे श्रीलंकेला कर्ज फेडण्यास मदत होईल आणि दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल. आयात पेमेंटसाठी डॉलरच्या संकटामुळे श्रीलंकेला सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेच्या सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारताकडून 1 अब्ज डॉलरचे कर्ज हे अन्न आयातीपुरते मर्यादित असेल.
India extends helping hand to Sri Lanka in financial crisis Jaishankar made many agreements
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App