विशेष प्रतिनिधी
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘इतर पक्ष घोषणापत्र जारी करतात आणि भाजप संकल्पपत्र प्रसिद्ध करतो. संकल्पपत्रात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. जेव्हा हेतू योग्य असतात तेव्हा परिणाम देखील योग्य असतात.’ We do not bring a manifesto we bring a resolution Prime Minister Modi criticized the Congress manifesto
याशिवाय, ‘मी ठरवले आहे की देशातील परिस्थिती बदलायची आहे. दहा वर्षांत केलेले काम केवळ ट्रेलर आहे, अजून खूप काही करायचे आहे. राजस्थानमधील चुरू येथे भाजपचे उमेदवार देवेंद्र झाझरिया यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत.
देशाला खूप पुढे न्यायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक फक्त स्वतःचे हित बघतात. त्यांना गरीब, दलित, शोषित आणि वंचितांच्या कल्याणाची आणि सन्मानाची चिंता नाही. चुरूने दाखवून दिलं आहे की, 4 जून रोजी एनडीएने चारशेचा टप्पा पार केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App