
परिस्थितीचे गांभीर्य पाहता नालंदामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
बिहारच्या सासाराममध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून झालेल्या गदारोळानंतर नालंदामध्येही प्रचंड हिंसाचार झाला होता. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. जमावाने अनेक दुचाकी आणि वाहने जाळली, शिवाय जमावाने एक बसही पेटवून दिली. Violence in Nalanda after Sasaram in Ram Navami procession Three people were injured in the firing
हिंसाचाराच्या वेळी गोळीबारही झाला ज्यामध्ये तीन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता नालंदामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बिहार शरीफच्या रुग्णालयातील डॉक्टर चित्रांश यांनी सांगितले की, तीन जणांना गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
#WATCH | Bihar: Clashes broke out between two groups near Gagan Diwan under Laheri Police Station area in Nalanda. Stone pelting and arson of vehicles also occurred. Police and Administration present at the spot. More details awaited.
(Note: Abusive language in the video) pic.twitter.com/zNIapQAtsd
— ANI (@ANI) March 31, 2023
लहेरी पोलीस स्टेशन परिसरात रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गट समोरासमोर आल्याने हिंसाचार झाला. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. रिपोर्टनुसार, अनेक दुकानांनाही आग लावण्यात आली. हिंसाचाराच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. सासाराममध्येही गदारोळ झाला होता.
Violence in Nalanda after Sasaram in Ram Navami procession Three people were injured in the firing
महत्वाच्या बातम्या
- TSPSC Paper Leak : तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवनाथ रेड्डी पोहचले ED कार्यालयात
- गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!!
- छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल; राज ठाकरेंनी आधीचे केले होते सावध; व्हिडिओ व्हायरल
- संजय राऊत सारखा भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो – चंद्रशेखर बावनकुळे