वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश कायदा आयोगाने तयार करून योगी आदित्यनाथ सरकारला सोपविला आहे. UP law commission submitted population control bill draft to Yogi government
या कायद्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींची शिफारस करण्यात आली असून यामध्ये तीनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या परिवारांच्या सवलती काढून घेण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. एक मुलं असणाऱ्या परिवाराला गोल्ड कार्ड तर दोन मुलं असणाऱ्या परिवारांना ग्रीन कार्ड देण्यात येऊन त्यांना विविध सरकारी सवलतींचा लाभ देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या परिवारात मधील व्यक्तींना निवडणूक लढविण्यापासून ते सरकारी सवलतींचा लाभ यांपासून दूर ठेवण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही उत्तर प्रदेश कायदा आयोगाने केली आहे.
उत्तर प्रदेशची लोकसंख्या वाढ 20.26 % आहे. गाजियाबादची लोकसंख्या 42 25 टक्क्यांनी वाढली. लखनऊ, सीतापूर, बरेली, मुरादाबाद येथे लोकसंख्या वाढीचे प्रमाण 25 टक्क्यांच्या आसपास आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण असेच राहिले तर आरोग्यसुविधा शिक्षण पिण्याचे शुद्ध पाणी आणि रोजगार उपलब्ध होण्यात प्रचंड अडचणी येतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा तातडीने संमत करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश कायदा आयोगाने योगी आदित्यनाथ सरकारला केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App