बागलीहार + सलाल + किशनगंगा सगळ्या धरणांची गेट बंद; पाकिस्तानात चिनाब + झेलम नद्या पडल्या कोरड्या!!

Pakistan Dam

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीर मधले महत्त्वाचे प्रकल्प बागलीहार + सलाल आणि किशनगंगा या सगळ्या धरणांची गेट बंद केली असून त्याचा परिणाम अवघ्या 16 तासांमध्ये पाकिस्तान दिसला. पाकिस्तानात वाहून जात असलेल्या चिनाब आणि झेलम नद्यांचा जलस्तर 40 % कमी झाला. ऐन उन्हाळ्यात आज जलस्तर कमी झाल्याने पाकिस्तानात पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.The gates of all the dams of Baglihar

रामबन जिल्ह्यातील बागलीहार आणि रेसाई जिल्ह्यातील सलाल धरणांची गेट बंद केल्यामुळे चिनाब नदीचा जलस्तर घटला. त्याचबरोबर किशनगंगा धरणाची गेट बंद केल्याने झेलम नदीचा जलस्तर घटला. परंतु तीनही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे भारतासाठी उपयुक्त असलेल्या विजेची निर्मिती सुरळीत सुरू राहणार आहे.



चिनाब आणि झेलम या दोन्ही नद्या पाकिस्तानातल्या पंजाब आणि सिंध प्रांतातून वाहत असल्याने तिथली शेती आणि पिण्याचे पाणी या दोन्ही बाबतीत पाकिस्तान या दोन्ही नद्यांच्या जलसाठ्यांवर अवलंबून आहे. या जलसाठ्यांचा स्तर आत्ताच 40 % घटला आहे. तिन्ही धरणांची गेट अजून काही काळ बंद राहिली, तर पाकिस्तानातला दोन्ही नद्यांचा जलस्तर झपाट्याने खाली येईल आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत तो 0 स्तरावर येऊन पोहोचेल. त्यामुळे पाकिस्तानात आत्तापासूनच हाहाकार व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याने आम्ही भारताच्या कुठल्याही प्रकल्पावर हल्ला करू, अशी धमकी दिली आहे. भारताने आता या तिन्ही धरणांच्या भोवतालची सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.

The gates of all the dams of Baglihar + Salal + Kishanganga are closed; Chenab + Jhelum rivers in Pakistan have dried up!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात