विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक सर्वेक्षणातून दाखविले विकसित भारताचे स्वप्न, पण मांडले वास्तवाचे देखील चित्र!!, असेच 2025 च्या आर्थिक सर्वेक्षणाचे वर्णन करावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण काही क्षेत्रातली आकडेवारी चिंताजनक नसली, तरी गंभीर इशारा देणारी निश्चित आहे. किंबहुना तो इशारा लक्षात घेऊन आधीपासूनच काळजीपूर्वक उपाययोजना केल्या पाहिजेत, हे सांगणारी आहे.
देशातल्या मध्यमवर्गीयांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका, त्यातून निर्माण होऊ शकणारी संभाव्य बेरोजगारी त्याचबरोबर घटणारे पगार याकडे आर्थिक सर्वेक्षणाने आवर्जून लक्ष वेधले आहे.
2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर देशाची अर्थव्यवस्था नियमितपणे किमान 8 % ने वाढत गेली पाहिजे. ज्याद्वारे देशात तंत्रज्ञानापासून ते कृषी क्षेत्रापर्यंत सर्वत्र खरी वाट दिसेल आणि त्याचा लाभ देशातल्या वाढत्या लोकसंख्येला होऊ शकेल, असे स्वप्न आर्थिक सर्वेक्षणाने दाखविले आहे पण त्याच वेळी आकडेवारीतले वेगळे वास्तव देखील समोर आणले आहे.
आकडे बोलले
AI मुळे मध्यमवर्ग आणि गरीबांसाठी चिंता निर्माण होऊ शकते. बेरोजगारी वाढू शकते आणि त्यांचे वेतन घटू शकते. एआयमुळे होणाऱ्या बदलांमध्ये जे विपरित परिणाम होणार आहेत ते कमी कसे करता येतील याबाबत विचार होणे गरजेचे आहे.
जगातील परिस्थिती ही अकल्पनीयरित्या बदलत चालली आहे. भू-राजकीय परिस्थितीमुळे जागतिक व्यापाराचे चित्र झपाट्याने बदलले आहे. यामुळे भारताच्या निर्यात वाढीपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App