पंतप्रधान मोदी आणि भाजपवर केलेल्या टीकेला दिलं आहे प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेवरून भारतीय जनता पक्ष आणि इंडी आघाडीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू आहे. इंडी आघाडीचे नेते भाजपवर राज्यघटना बदलल्याचा आरोप करत आहेत. तर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी हल्ला चढवत पंतप्रधानांना राज्यघटनेचे मूलभूत ज्ञान नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या विधानाचा समाचार घेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले की, बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांकडे असलेली राज्यघटना कदाचित भारताची नाही. यासोबतच त्यांनी विचारले की यादव हे संविधान तज्ज्ञ आहेत का?The constitution they read is probably not that of India Himanta Sarma attacks Rahul Gandhi and Tejaswi Yadav
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्याकडे संविधानाची प्रत आहे. त्यावर चिनी राज्यघटनेप्रमाणे लाल कव्हर आहे, तर मूळ भारतीय राज्यघटनेला निळे कव्हर आहे. आरजेडी नेत्यांनी जी राज्यघटना वाचली ती बहुधा भारताची नाही.
सरमा यांनी तेजस्वी यादव यांची खिल्ली उडवली आणि विचारले की ते संविधानाचे तज्ञ आहेत का? त्यांच्याकडे डी.लिट पदवी आहे का? मोदींनी विधानसभेत दावा केला होता की विरोधी आघाडीने ठरवले आहे की जर ते सत्तेवर आले तर ते सर्वात पहिले संविधान बदलतील, कारण त्यांना तुष्टीकरणाचे धोरण पाळायचे आहे.
त्याचवेळी तेजस्वी यादव म्हणाले होते की, भाजपला आरक्षण संपवायचे आहे. त्यांच्या पक्षाने जात जनगणनेसाठी पत्र लिहिले होते पण त्यांनी ते नाकारले. मात्र, बिहारमध्ये जात जनगणना झाली आणि ७५ टक्के आरक्षण देण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App