संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ हजार २१८ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत. देशात सर्वाधिक इंजेक्शन महाराष्ट्रालाच मिळणार आहेत.The central government rushed to the aid of Maharashtra and will get 2 lakh 69 thousand remediaries
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ हजार २१८ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणा आहेत. देशात सर्वाधिक इंजेक्शन महाराष्ट्रालाच मिळणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन महाराष्ट्रासह कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह १९ राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरविण्याचे आदेश दिले आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा प्रचंड वेगाने वाढविला आहे.
त्यामुळे येत्या आठ दिवसांत महाराष्टÑाला इंजेक्शन मिळणार आहेत. महाराष्ट्राला सिप्ला कंपनीकडून ९२,४००, झायडस कॅँडेला आणि हेट्रो या कंपन्यांकडून प्रत्येकी ५० हजार, मिलानकडून ३२ हजार, सिनर्जीकडून २३ हजार,ज्युबिलंटकडून १६ हजार, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडून ५,८०० इंजेक्शन मिळणार आहेत.
छत्तीसगडला ४८,२५०, दिल्लीला ६१,८२५, गुजरातला १,६३,५५९, हरियाणाला २९,४४१, आंध्र प्रदेशाला ५८,८८१, कर्नाटकाला २५,३५२, मध्य प्रदेशाला ९२,४११, पंजाबला १३,४१२, राजस्थानला २६,१६९, तमीळनाडूला ५८,८८१, उत्तर प्रदेशला १,२२,८३३ आणि उत्तराखंडला १३,५७५ इंजेक्शन मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App