तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर एका व्यक्तीने हल्ला केला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. यामध्ये भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, या वृत्ताचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे.Tamil Nadu BJP Office Attacked Attack on BJP office in Tamil Nadu, Unidentified person throws petrol bomb
वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर एका व्यक्तीने हल्ला केला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. यामध्ये भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, या वृत्ताचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे.
याबाबत भाजपचे नेते त्यागराजन म्हणाले की, रात्री दीडच्या सुमारास आमच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. 15 वर्षांपूर्वी द्रमुकची भूमिका असतानाही अशीच घटना घडली होती. या घटनेबद्दल आम्ही तामिळनाडू सरकारच्या (भूमिकेचा) निषेध करतो…आम्ही पोलिसांनाही कळवले आहे…भाजप केडर अशा गोष्टींना घाबरत नाही.
A petrol bomb was hurled at our office around 1:30 am. Similar incident took place 15 years ago with DMK's role in it. We condenm Tamil Nadu govt's (role) for this incident…We have also informed Police…BJP cadre doesn't get afraid of such things: Karate Thyagarajan, BJP pic.twitter.com/XVr4GfsUFX — ANI (@ANI) February 10, 2022
A petrol bomb was hurled at our office around 1:30 am. Similar incident took place 15 years ago with DMK's role in it. We condenm Tamil Nadu govt's (role) for this incident…We have also informed Police…BJP cadre doesn't get afraid of such things: Karate Thyagarajan, BJP pic.twitter.com/XVr4GfsUFX
— ANI (@ANI) February 10, 2022
तामिळनाडू भाजप प्रमुख अन्नामलाई यांनी म्हटले की, या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करण्याची आमची मागणी आहे. दोषींवर गुन्हा दाखल करून शिक्षा झाली पाहिजे. आपल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. या घटनेवर NIA हा एकमेव उपाय आहे जिथे सत्य आणि कट बाहेर येईल. या पेट्रोल बॉम्बमागे मोठे षडयंत्र आहे असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही एनआयए चौकशीची मागणी करत आहोत. सत्य बाहेर आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 29 भारतीय मच्छिमार आणि त्यांच्या 79 मासेमारी नौकांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. श्रीलंकेच्या नौदलाने काही आठवड्यात तामिळनाडूतील मच्छिमारांना अटक केल्याच्या तिसऱ्या घटनेकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले की, या घटनेने राज्यातील जनतेला धक्का बसला आहे.
“मनमानी करण्याच्या या ताज्या घटनेत, 11 भारतीय मच्छिमारांना 7 फेब्रुवारी रोजी श्रीलंकन नौदलाने अटक केली आणि मायिलाट्टी नौदल तळावर नेले,” ते म्हणाले. मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे आणि 79 मासेमारी नौका जप्त करण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App