पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारतात परतल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळांना भेट दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारताने जगभरात पाकिस्तानाच खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता का होती, हे सांगण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली.
ही बैठक ७ लोक कल्याण मार्ग येथे झाली. या दरम्यान, पंतप्रधानांनी काँग्रेस नेते शशी थरूर, जद (यु) चे संजय झा आणि इतरांची भेट घेतली. ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत सरकारने एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांची घोषणा केली होती. या दरम्यान, सत्ताधारी एनडीए युती आणि विरोधी इंडिया ब्लॉकचे सदस्य सहभागी झाले होते.
भाजपचे रविशंक प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जद (यु) चे संजय झा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, द्रमुकच्या कनिमोळी आणि राष्ट्रवादी (सपा) च्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सात शिष्टमंडळे दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या धोरणाची लोकांना जाणीव करून देण्यासाठी जगाच्या अनेक भागात गेले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांना भेटलो आणि शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाचा धोका दूर करण्याची गरज यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी भारताचा आवाज ज्या पद्धतीने पुढे नेला त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे.” पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारतात परतल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळांना भेट दिली.
७ शिष्टमंडळे, ३३ देश
शिष्टमंडळांमध्ये ५० हून अधिक सदस्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळांमध्ये बहुतेक माजी खासदार आणि विद्यमान खासदारांचा समावेश होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या नेतृत्वाखालील सात शिष्टमंडळांनी दहशतवादाबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी ३३ परदेशी राजधान्या आणि युरोपियन युनियनला भेट दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App