पुण्यातून पवारांचा आणि कोलकत्यातून ममतांचा मोदींवर हल्ला; पण दोघांनीही काँग्रेसच्या पायाखालच्या सतरंज्या खेचल्या!!

Pawar attacks Modi

नाशिक : पुण्यातून शरद पवारांचा आणि कोलकत्यातून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला, पण दोघांनीही काँग्रेसच्याच पायाखालच्या सतरंज्या खेचल्या हेच राजकीय वास्तव चित्र आज समोर आले.

पुण्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडला. त्या कार्यक्रमात शरद पवार यांना बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याचा कळवळा आला. त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण झाले, याबाबत पवारांनी मोहम्मद युनूसला दोष दिला नाही. पण बांगलादेशाशी भारत चांगले संबंध ठेवू शकला नाही, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र दोष दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आक्रमक परराष्ट्र धोरणावर पवारांनी टीकास्त्र सोडले. भारताच्या सध्याच्या राज्यकर्त्यांना आपल्या शेजारच्या देशांशी सुसंवाद ठेवता आला नाही. त्यामुळे चीन, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे आपले शेजारी देश भारताचे मित्र उरलेले नाहीत, असा दावा पवारांनी केला. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी शेजारच्या देशांशी चांगले संबंध ठेवले होते अशी पुस्तीही पवारांनी जोडली.

बांगलादेशचा राज्यकर्ता मोहम्मद युनूस याच्याशी आजही आपले चांगले संबंध आहेत. आधीही आपले चांगले संबंध होते‌. आपल्याबरोबर ते पुण्याला आले होते, याची आठवण पवारांनी आवर्जून सांगितली.

त्याचवेळी पश्चिम बंगाल मधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल केला. पहलगाममध्ये झालेला हल्ला हा मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे झाला. बायसरण घाटीत सरकारने एकही पोलीस बंदोबस्तासाठी ठेवला नव्हता. त्यामुळे दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी मोकळे रान मिळाले. पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात पळून गेले. मोदी सरकार अजूनही त्यांना पकडू शकले नाही, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी मोदी सरकारचे वाभाडे काढले. पुलवामा हल्ल्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ममतांनी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याचे केले. पश्चिम बंगाल विधानसभेत तसा ठराव मंजूर केला.



पवार आणि ममतांची काँग्रेसवर game

पण शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या मोदी सरकार वरल्या हल्ल्याचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी काँग्रेसच्या पायाखालच्या मात्र सतरंज्या खेचल्या. काँग्रेसने मोदी सरकारकडे संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली. त्या मागणी पत्रावर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे या दोघांनी सही केली नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसने त्या मागणी पत्रावर सही केली, पण राहुल गांधींच्या कुठल्याही उपक्रमात तृणमूळ काँग्रेसचे नेते सहभागी झाले नाहीत. त्याचबरोबर तृणमूळ काँग्रेसच्या कुठल्याही उपक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनाही त्यांनी सहभागी करून घेतले नाही. ‌

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर आपल्या सोयीनुसार हल्लाबोल केला. पण त्यामधून काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या अजेंड्याला बळ मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.

Pawar attacks Modi from Pune and Mamata from Kolkata

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात