PAK Army : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा- भारत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप; PAK लष्कराने चॅटचे स्क्रीनशॉट दाखवले

PAK Army

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : PAK Army पाकिस्तानी लष्कराने भारतावर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली.PAK Army

या ब्रीफिंगमध्ये शरीफ यांनी दावा केला की, २५ एप्रिल रोजी पाकिस्तानी सैन्याने झेलम नदीजवळून भारताने प्रशिक्षण दिलेल्या पाकिस्तानी नागरिक अब्दुल मजीदला अटक केली होती.

शरीफच्या म्हणण्यानुसार, अब्दुलकडून २.५ किलो आयईडी, दोन मोबाईल फोन आणि ७०,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत. अब्दुलच्या घरातून एक भारतीय ड्रोन आणि १० लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे लष्कराने पुढे सांगितले.



पाकचा दावा- अब्दुल भारतीय अधिकाऱ्याच्या संपर्कात होता.

पत्रकार परिषदेदरम्यान शरीफने अब्दुलच्या सिकंदर नावाच्या माणसाशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट दाखवला. शरीफ यांनी दावा केला की, सिकंदर नावाचा हा माणूस भारतीय सैन्यात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) आहे, ज्याचे नाव सुभेदार सुखविंदर आहे.

शरीफ यांनी दावा केला की, या कामात तीन भारतीय अधिकारी सहभागी आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत-

१. जम्मू आणि काश्मीरमधील कमांडिंग ऑफिसर – संदीप वर्मा (समीर)

२. सुभेदार सुखविंदर (सिकंदर)

३. सुभेदार अमित (आदिल अमन)

गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. जगभरात अनेक मोठी संकटे सुरू आहेत, त्यामुळे या धोक्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी लक्ष दिले जात आहे.

भारत आता पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी जागा तयार करत असल्याचे दिसून येत आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत डझनभराहून अधिक देशांच्या नेत्यांशी संवाद साधला आहे.

दिल्लीतील १०० देशांमधील राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून माहिती देण्यात आली. पण भारताचे उद्दिष्ट तणाव कमी करणे नसून जगाला पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी तयार करणे आहे असे दिसते.

मोदींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले जातील आणि हल्ल्याचा बदला घेतला जाईल. दोन्ही देशांच्या सीमेवर हलक्या स्वरूपाचा गोळीबारही सुरू आहे. भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये कडक कारवाई सुरू केली आहे आणि शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे.

भारत-पाकमधील लष्करी कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

भारताने पाकिस्तानला जाणारे नद्यांचे पाणी रोखण्याचा इशाराही दिला आहे. पाकिस्तानी राजदूतांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्ताननेही प्रत्युत्तरात्मक पाऊल उचलले आहे आणि भारतासोबतच्या काही करारांमधून माघार घेणार असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत, त्यामुळे कोणत्याही लष्करी कारवाईमुळे परिस्थिती झपाट्याने बिघडू शकते. पण यावेळी भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव खूपच कमी आहे आणि अलिकडच्या काळात भारताचा आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव वाढल्याने भारताने पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

इराण आणि सौदी अरेबियाने दोन्ही देशांशी चर्चा केली आहे, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनने शांततेचे आवाहन केले आहे, परंतु अमेरिकेसारखे मोठे देश इतर समस्यांमध्ये व्यस्त आहेत. भारत याचा स्वतःच्या बाजूने विचार करत आहे.

Pakistan Vs India on promoting terrorism; PAK Army shows screenshots of chat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात