बिहारमध्ये नितीश कुमारांवर over dependency ने भाजपला तोटा; चिराग पासवानने मध्येच दामटला घोडा!!

नाशिक : नितीश कुमार यांच्यावर over dependency म्हणजेच ज्यादा अवलंबित्व ठेवल्याने भाजपला तोटा चिराग पासवान यांनी मध्येच दामटला घोडा!! ही बिहारच्या राजकारणातल्या निवडणुकीपूर्वीची सुरुवात आहे. वास्तविक या राजकारणाची सुरुवात राहुल गांधींनी कन्हैया कुमार याचा घोडा पुढे दामटून केलीच होती. पण सुरुवातीला तरी राहुल गांधींना त्यातून कुठला प्रतिसाद मिळाला नव्हता.

पण आता poll tracker ने केलेल्या सर्वेक्षणात राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पेक्षा जास्त मते मिळाली आणि तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. त्यामुळे नितीश कुमार यांच्यावर जास्त अवलंबित्व ठेवल्याने भाजपचा तोटा झाला, हे बिहारच्या राजकारणातले सत्य निवडणुकीच्या सुरुवातीलाच समोर आले. याच कालावधीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आपला घोडा पुढे दामटला. आपण बिहारमध्ये 243 जागांवर निवडणूक लढवू आपल्याला कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची हे मतदारांनी सांगावे, असे जाहीर आवाहन चिराग पासवान यांनी केले. याचा अर्थ चिराग पासवान यांचे समाधान केंद्रीय मंत्रीपदापुरते मर्यादित ठेवण्यात भाजपच्या नेतृत्वाला यश आले नाही, असाच काढावा लागेल.



शिवाय नितीश कुमार यांच्याबरोबर भाजप सलग दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेवर येऊन देखील भाजपने बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र असे नेतृत्व विकसित केले नाही. भाजपच्या नेतृत्वाची फळी विकसित केली, तरी एकाच नेत्यावर विश्वास टाकून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कुणाला पुढे आणले नाही. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला बिहारच्या जनतेने नेहमीच दुय्यम किंवा तिय्यम स्थानावर ठेवून नितीश कुमार यांची शक्ती किती मर्यादित आहे हे वारंवार दाखवून दिले, तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केवळ नितीश कुमार यांच्या ज्येष्ठतेमुळे आणि त्यांच्या राजकीय उपद्रव मूल्यामुळे त्यांचे महत्त्व “अबाधित” ठेवले, पण त्याचा तोटा संघटनात्मक पातळीवर भाजपला झाला. यातून नितीश कुमार यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याची महत्त्वाकांक्षा कधी शमली नाहीच, उलट चिराग पासवान याच्यासारख्या तरुण नेत्याची महत्त्वाकांक्षा फुलून आल्याचे चित्र भाजपच्या नेतृत्वाला पाहावे लागले.

– Poll tracker सर्वेक्षण

वास्तविक भाजपकडे बिहारमध्ये चेहरे नाहीत असे अजिबात नाही सम्राट चौधरींसारखा मोठा चेहरा आणि त्याचबरोबर भाजपचे मोठे संघटन या दोन्ही बाबी राज्यात अनुकूल आहेत. पण तरी देखील केंद्रीय नेतृत्वाने स्वतःच्या राजकीय हिशेबासाठी बिहार प्रदेश भाजपला राज्यात दुय्यम स्थानावर ठेवले. याचा तोटा झाल्याचे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात समोर आले. Poll tracker ने केलेल्या सर्वेक्षणात राष्ट्रीय नेतृत्वात राहुल गांधी नरेंद्र मोदींना भारी ठरले. राहुल गांधींना 47% लोकांनी मते दिली तर नरेंद्र मोदींना 39 % लोकांना पसंती दिली. बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्यावर तेजस्वी यादव भारी ठरले. तेजस्वी यादवांना 43 % मते मिळाली, तर नितेश कुमार फक्त 31 % मत मिळवू शकले. INDI आघाडीला 126, तर NDA ला 112 जागा मिळण्याची शक्यता poll tracker ने दाखविली.

पण या सर्वेक्षणाचा आणि चिराग पासवान यांच्या फुललेल्या महत्त्वाकांक्षेचा एकूण अर्थ असाच, की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमध्ये पक्षाचे बळकट नेतृत्व समोर आणले नाही. राज्यात कुठल्याही पक्षांपेक्षा भाजपची पक्ष संघटना बळकट केली असतानाही एकमुखी नेतृत्व उभे केले नाही. त्यामुळे इतर छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेले चित्र पाहावे लागले.

Over dependency on Nitish Kumar loss of BJP in Bihar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात