वृत्तसंस्था
नवी दिल्ली : NSA Doval भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी १८ मे २०२५ रोजी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एसएनएससी) सचिव अली अकबर अह्मदियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत भारत-इराण धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली, ज्यात विशेषतः चाबहार पोर्ट प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरवर (आयएनएसटीसी)जोर देण्यात आला. भारताने प्रादेशिक स्थिरतेत इराणच्या ‘रचनात्मक भूमिके’ची प्रशंसा केली आणि चाबहार प्रकल्पावर सहकार्य वाढविण्यात भारताची रुची व्यक्त केली. हा प्रकल्प भारताला पाकिस्तानला बगल देत मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा मार्ग देतो. अह्मदियान यांनी राजकीय आणि आर्थिक सहकार्याच्या व्यापक शक्यतांवर जोर दिला आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी चाबहार आणि आयएनएसटीसी सारख्या धोरणात्मक प्रकल्पांना गती देण्याची गरज सांगितली. या राजनैतिक संपर्काला भारताच्या पाकिस्तानला घेरण्याच्या व्यापक रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे, अफगाणिस्तानसोबत भारताच्या वाढत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर. चाबहारला पाकिस्तान आपली भू-राजकीय कोंडी म्हणून पाहतो.NSA Doval
यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मावलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर बोलले होते, जे १९९९ नंतर भारत आणि तालिबान यांच्यातील पहिले संभाषण होते.
चाबहार पोर्ट प्रकल्पाच्या निर्बंधांची सूट ट्रम्प यांच्याकडून परत
चाबहार पोर्ट प्रकल्प अमेरिकेमुळे चांगलाच प्रभावित झाला आहे. अमेरिका इराणवर दबाव आणण्यासाठी निर्बंधांची धमकी देत आला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांमुळे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी अंतर राखले. त्यानंतर २०१८ मध्ये अमेरिका चाबहार पोर्ट प्रकल्पाला निर्बंधांपासून वगळण्यास राजी झाला, ज्यामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली. पण, फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही सूट संपुष्टात आणली, ज्यामुळे भारतीय कंपन्यांना निर्बंधांना सामोरे जाण्याचा धोका वाढला आहे.
चाबहार पोर्ट: चीनद्वारे विकसित पाकच्या ग्वादर पोर्टला टक्कर
१२ सप्टेंबर २००० रोजी भारत, इराण आणि रशियाने सेंट पीटर्सबर्ग येथे आयएनएसटीसी करारावर स्वाक्षरी केली. ७,२०० किमी लांबीचा मल्टी-मॉडल नेटवर्क कॉरिडॉर समुद्र, रेल्वे आणि रस्ते मार्गांद्वारे भारत, इराण, मध्य आशिया, रशिया आणि युरोपला जोडतो. या कॉरिडॉरमुळे वस्तू पाठवताना पारंपरिक मार्गांच्या तुलनेत ४०% वेळ आणि ३०% खर्च वाचतो. या कॉरिडॉरमुळे इराण एक ट्रान्झिट हब म्हणून उदयास येतो. पाकिस्तानला भीती आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तो भू-राजकीयदृष्ट्या एकाकी पडू शकतो. भारताने २०१६ मध्ये इराणच्या चाबहार पोर्टच्या विकासासाठी ३,७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. भारताने १८७.५ कोटी रुपये खर्चून ६ मोबाईल हार्बर क्रेन व इतर उपकरणांचा पुरवठा केला. चाबहार पोर्ट भारताला पाकिस्तानला बगल देत अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत थेट प्रवेश प्रदान करते. चीनद्वारे विकसित केल्या जात असलेल्या पाकच्या ग्वादर पोर्टला टक्कर देण्यासाठी मदत करेल. चाबहारमुळे भारतीय नौदलाची पश्चिम हिंद महासागर आणि पर्शियन गल्फमधील उपस्थिती मजबूत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App