विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि तिन्ही प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात सीआरपीएफने (केंद्रीय राखीव पोलीस बल) महत्त्वाची भूमिका बजावली आहे.Naxalism, sponsored terrorism and insurgency will be eradicated, Union Home Minister Amit Shah believes in CRPF
पुढील काही वर्षांत तिन्ही भागात सीआरपीएफला पुन्हा तैनात करण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.आझाद स्टेडियमवर सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सभेत शहा बोलत होते.
केंद्रीय राखीव पोलिस दलाचे काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्येतील बंडखोर शक्तींविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी आज सीआरपीएफच्या वार्षिक कामगिरीबद्दल माहिती दिली.
शहा म्हणाले, सीआरपीएफ हे केवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल नाही तर देशातील प्रत्येक मुलाला त्याच्या शौर्य आणि धैयार्साठी आवडते. देशात कुठेही दंगल झाली की सीआरपीएफच्या तैनातीमुळे लोकांना सुरक्षितता मिळते.
देशाच्या सर्वांत मोठ्या निमलष्करी दल सीआरपीएफला जे प्रेम आणि आदर मिळाला आहे ते त्यांच्या जवानांच्या त्याग आणि समर्पणामुळे आहे. १९९० च्या दशकात एक काळ होता जेव्हा ईशान्येकडील दहशतवाद आणि काश्मीरमध्य पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद शिगेला पोहोचला होता आणि देशातील प्रत्येकजण चिंतेत होता. दोन दशकांत सीआरपीफ ने समर्पण आणि दृढनिश्चयाने देशविरोधी शक्तींविरुद्ध लढा दिला, जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App