वृत्तसंस्था
बंगळुरू : जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील, असे म्हटले. ‘संविधान आणि राष्ट्रीय एकता परिषद-2024’ च्या समारोपाचे भाषण करताना, श्रीनगरच्या खासदारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएमबद्दल चिंता व्यक्त केली आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.National Conference chief Farooq Abdullah said, ‘Kashmir was, is and will always be a part of India’.
फारुख म्हणाले, “मी माझ्या लोकांच्या वतीने तुमच्यासाठी शुभेच्छा घेऊन आलो आहे. काश्मीर हा भारताचा भाग होता, भारताचा भाग आहे आणि भारताचाच भाग राहील.” मात्र, देशाला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एनसी प्रमुख म्हणाले, “धर्म आपल्यात फूट पाडत नाही, धर्म आपल्याला एकत्र करतो. कोणताही धर्म वाईट नसतो, आपणच त्याचे वाईट रीतीने पालन करतो. जर आपल्याला पुढे जायचे असेल तर पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एकमेकांच्या सोबतीने. एकत्र उभे राहा, आव्हानांचा सामना करा. राष्ट्राने संघटित होऊन आपल्यात फूट पाडू पाहणाऱ्या दुष्टांचा सामना केला पाहिजे.”
आज संविधान धोक्यात : फारुख अब्दुल्ला
आज संविधान धोक्यात असल्याचा दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केला. ते बळकट करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. ते म्हणाले, “आम्ही हे केले नाही, तर येत्या काळात आम्हाला पश्चाताप होईल. अनेक वर्षांपूर्वी आलेल्या या मशीनचा (ईव्हीएम) आज आम्हाला पश्चाताप होत आहे.”
एनसी अध्यक्ष म्हणाले, “आज आमचा या मशीनवर विश्वास नाही कारण यात छेडछाड करण्यात आली आहे आणि जे लोक मतदान करतात त्यांना त्यांचे मत तिथे दिसत नाही. मला आशा आहे की निवडणूक आयोग याकडे योग्य लक्ष देईल आणि “लोकांना खऱ्या निवडणुका व्हाव्यात याची खात्री होईल.”
ते म्हणाले, “लोकांना जे हवे आहे, ते दिले पाहिजे. मला आशा आहे की तसे होईल अन्यथा अशी वेळ येईल जेव्हा संविधानासारखे काहीही राहणार नाही, आपल्याकडे जी विविधता आहे, त्यात काहीही राहणार नाही.”
त्याच कार्यक्रमात सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही चरित्र आरएसएस समर्थित फॅसिस्ट “हिंदुत्व राष्ट्र” मध्ये बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ज्याचा समाज ‘मनुस्मृती’वर आधारित असेल. जातीय दडपशाही आणि पदानुक्रमाचा आधार असेल.
ही लढाई भारताला पुढे आणि मागे घेऊन जाणाऱ्यांमध्ये आहेः सीताराम येचुरी
ते म्हणाले, “आम्ही जेव्हा ही राज्यघटना स्वीकारली तेव्हा आम्ही त्यांना इतिहासात मागे सोडले, ते (भाजप) आता आम्हाला इतिहासाच्या अंधारात नेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आम्ही भारताला भविष्याच्या उज्ज्वलतेकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही लढाई भारताला पुढे घेऊन जाणाऱ्या आणि मागे नेणाऱ्यांमध्ये आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App