वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकात गोहत्येवर बंदी आहे. याबाबत नवीन सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश म्हणतात की, जर म्हशींची कत्तल होऊ शकते तर गायींची का नाही?Minister of Karnataka said – buffaloes can be slaughtered, why not cows? Demand for Amendment in Cow Slaughter Prohibition Bill
गोहत्या संरक्षण कायद्यात बदल करण्याचे संकेत देत मंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार गोहत्या प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण विधेयक 2020 मध्ये सुधारणा करण्याच्या विचारात आहे. हे विधेयक 2021 मध्ये भाजप सरकारने आणले होते.
Siddharamaiah Profile : दुसऱ्यांदा बनणार कर्नाटकचे मुख्यमंत्री, जेडीएस सोडून काँग्रेसचा धरला ‘हात’, अशी आहे राजकीय कारकीर्द
आपल्या युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री म्हणाले की, शेतकऱ्याला वृद्ध गुरे पाळणे आणि मेलेली जनावरे वाहून नेणे ही समस्या आहे. त्यांनी असा दावा केला की त्यांना अलीकडेच त्यांच्या फार्महाऊसमधून मृत गायी काढण्यात काही अडचणी आल्या होत्या.
सध्याचा कायदा काय म्हणतो?
बीएस येडियुरप्पा यांच्या मागील भाजप सरकारने 2010 आणि 2012 मध्ये 1964च्या कायद्यात सुधारणा करून दोन विधेयके सादर केली होती. 2014 मध्ये सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ही विधेयके मागे घेतली होती. नवीन विधेयकात 13 वर्षांखालील गाय, वासरे, बैल आणि म्हशींच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये, कर्नाटक गोहत्या प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण (सुधारणा) विधेयक, 2020 विधानपरिषदेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आणि विरोधी सदस्यांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या.
तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास
सुधारित विधेयकात भाजपने गोवंशाची व्याख्या विस्तृत केली होती, शिक्षा कठोर केली होती आणि गोहत्या करण्यासाठी वयोमर्यादा वाढवली होती. 2020 च्या विधेयकाने पोलिस अधिकार्यांना परिसर शोधण्याचे आणि जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलीसाठी वापरलेली गुरेढोरे आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार दिले आहेत, पहिल्या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 ते 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
कर्नाटक हे 21 वे राज्य, जिथे गोहत्येवर बंदी
कर्नाटक हे आता देशातील 21 वे राज्य आहे जिथे गोहत्येवर बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, गुजरात, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, बिहार, झारखंड या 20 राज्यांमध्ये गोहत्या गुन्हेगारीच्या श्रेणीत आली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये अजूनही पूर्णपणे बंदी नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App