वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील न्यू लामका येथील पीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बांधलेल्या ओपन जिमला जमावाने गुरुवारी आग लावली. या जिमचे उद्घाटन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या हस्ते होणार होते.Manipur violence Internet shut down in Churachandpur district, Section 144 imposed; The violence happened before the Chief Minister’s visit
सद्भाव मंडपातील जाहीर सभेच्या ठिकाणीही जमावाने तोडफोड केली. या घटनेनंतर राज्यातील चुराचांदपूर जिल्ह्यात इंटरनेटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून कलम 144 लागू करण्यात आली आहे.
जमावाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळाची केली तोडफोड, जाळपोळ
चुराचांदपूर जिल्ह्यातील न्यू लामका येथे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका बेकायदेशीर जमावाने तोडफोड केली आणि आग लावली. स्थानिक पोलिसांनी जमाव त्वरित पांगवला, मात्र गुरुवारी रात्री शेकडो खुर्च्या जाळण्यात आल्या. कार्यक्रम स्थळाचेही मोठे नुकसान झाले.
Manipur | Mob set fire to an open gym constructed at PT Sports Complex in New Lamka, Churachandpur District yesterday which was to be inaugurated by CM N Biren Singh. The mob also vandalised the public meeting venue at Sadhbhav Mandap. Following the incident, Internet has been… pic.twitter.com/tMh4gZpI8c — ANI (@ANI) April 28, 2023
Manipur | Mob set fire to an open gym constructed at PT Sports Complex in New Lamka, Churachandpur District yesterday which was to be inaugurated by CM N Biren Singh. The mob also vandalised the public meeting venue at Sadhbhav Mandap.
Following the incident, Internet has been… pic.twitter.com/tMh4gZpI8c
— ANI (@ANI) April 28, 2023
पोलिसांनी सांगितले की, संतप्त जमावाने न्यू लामका येथील पीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नव्याने स्थापन केलेल्या ओपन जिमला अर्धवट आग लावली, ज्याचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या हस्ते होणार आहे. ओपन जीमच्या उद्घाटनाव्यतिरिक्त बिरेन सद्भावना मंडपातील आणखी एका कार्यक्रमालाही हजर राहणार आहेत.
स्थानिक आदिवासी नेत्यांच्या मंचाने सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत चुराचांदपूर बंदची हाक दिल्यानंतर जमावाने हल्ला केला. शेतकरी आणि इतर आदिवासी रहिवाशांच्या राखीव वनक्षेत्रे खाली करण्यासाठी सुरू असलेल्या निष्कासन मोहिमेचा निषेध करण्यासाठी सरकारला वारंवार निवेदन देऊनही सरकारने लोकांचे हाल दूर करण्यासाठी प्रामाणिकपणा किंवा इच्छा दाखवली नाही, असा दावा फोरमने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App