वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Kumar Ketkar काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी सांगितले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव केवळ नाराजीमुळे झाला नाही, तर त्यात अमेरिकन एजन्सी सीआयए (CIA) आणि इस्रायलच्या मोसादची (Mossad) भूमिका होती.Kumar Ketkar
ते संविधान दिनानिमित्त आयोजित काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केतकर म्हणाले की, काँग्रेसने 2004 मध्ये 145 जागा जिंकल्या होत्या आणि 2009 मध्ये त्या वाढून 206 झाल्या. जर हा ट्रेंड कायम राहिला असता, तर 2014 मध्ये काँग्रेसला 250 जागा मिळाल्या असत्या, पण पक्ष केवळ 44 जागांवर का आला?Kumar Ketkar
त्यांनी दावा केला की, सीआयए (CIA) आणि मोसादने (Mossad) निवडणुकीपूर्वी भारतातील राज्ये आणि जागांचा डेटा गोळा केला आणि योजनेनुसार काँग्रेसला कमकुवत केले.
VIDEO | Congress leader Kumar Ketkar on Wednesday claimed that the CIA and the Mossad, the spy agencies of the United States and Israel respectively, had plotted the defeat of the Congress in the 2014 Lok Sabha polls. Speaking at an event organised by the Congress on the… pic.twitter.com/gDrrlDs5Dx — Press Trust of India (@PTI_News) November 27, 2025
VIDEO | Congress leader Kumar Ketkar on Wednesday claimed that the CIA and the Mossad, the spy agencies of the United States and Israel respectively, had plotted the defeat of the Congress in the 2014 Lok Sabha polls.
Speaking at an event organised by the Congress on the… pic.twitter.com/gDrrlDs5Dx
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2025
कुमार केतकर म्हणाले, “२००४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने १४५ तर त्यानंतर २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत २०६ मतदारसंघात विजय मिळवला होता. जर हाच कित्ता पुढे कायम राहिला असता तर काँग्रेसने २०१४ च्या निवडणुकीत स्वबळावर २५० हून अधिक जागा जिंकत सत्ता कायम राखली असती. मात्र तसे झाले नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा जिंकता आल्या. काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार हे लक्षात आल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. कोणत्याही परिस्थितीत २०१४ मध्ये काँग्रेसच्या जागा वाढूच नयेत, असा प्रयत्न झाला. काँग्रेसला जर खाली खेचले नाही तर आपल्याला इच्छित कामे करता येणार नाहीत, असा डाव काही लोकांनी आखला होता”
ते पुढे म्हणाले, “काँग्रेस २०६ वरून थेट ४४ जागांवर कशी काय येऊ शकते? याच्यावर माझाच काय कुणाचाच विश्वास बसत नाही. हे काय फक्त जनमतामुळे आलेला नाही. काँग्रेसच्या विरोधात असंतोष, नाराजी होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात नाराजी होती. पण म्हणून २०६ चा आकडा ४४ वर जाईल, अशी काही परिस्थिती नव्हती. काँग्रेसला २०६ वरून खाली खेचल्याशिवाय आपल्याला इथे डावपेच खेळता येणार नाहीत. हे समजून वागणाऱ्या ज्या काही संस्था होत्या, त्यात एक होती सीआयए आणि दुसरी संस्था होती मोसाद. काँग्रेस किंवा काँग्रेस आघाडीचे सरकार भारतात आल्यास आपल्याला काहीच करता येणार नाही, असा काही संस्थांचा अंदाज होता.”
स्वतःला अनुकूल असलेले सरकार भारतात आल्यास ते आपल्या ताब्यात राहिल. त्यामुळे काँग्रेसप्रणित सरकारला आघाडी नको, असा प्रयत्न झाला. मोसादने याचे संपूर्ण स्ट्रक्चर तयार केले. मोसादला आपण कमी लेखता कामा नये किंवा ती फार प्रभावशाली संस्था आहे, असेही मानता कामा नये. मोसादने बारकाईने निवडणुकीचा आणि प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास केला. आपल्या मतदारसंघांचा बारीकसारीक तपशीलही या संस्थांकडे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App