मोदी सरकारचे Waqf board सुधारणा बिल सरकार उद्या लोकसभेत; चर्चेसाठी आठ तासांचा कालावधी, पण विरोधकांचा आजच सभात्याग!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातले मोदी सरकार Waqf board सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार आहे. त्यावरच्या चर्चेसाठी सभापतींनी आठ तासांचा कालावधी निश्चित केला, पण सभापतींनी हा निर्णय देताच विरोधकांनी आजच सभात्याग करून ते मोकळे झाले.

केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन संसदेतल्या कामकाजाची माहिती दिली. केंद्र सरकारने उद्या 2 एप्रिल 2025 रोजी Waqf board सुधारणातील लोकसभेत मांडायचा निर्णय घेतलाय. सर्व विरोधकांना लोकसभेच्या सभागृहात आणि राज्यसभेच्या सभागृहात आपापली जी काही मते मांडायचीत, ती मांडायची मुभा मिळणार आहे.

संसदेच्या सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार सभापतींनी संबंधित विधेयकावर आठ तासांची चर्चा निर्धारित केली आहे. काही सदस्यांनी चार तास, तर काही सदस्यांनी सहा तास चर्चा व्हावी असे सुचवले होते, तर विरोधकांनी 12 तासांच्या चर्चेची मागणी केली. शेवटी सभापतींनी आठ तास चर्चा होईल असे जाहीर केले, पण त्याचवेळी त्यांनी सदनाचे मत लक्षात घेऊन चर्चेचा कालावधी वाढवता देखील येईल, असे स्पष्ट केले. परंतु, विरोधकांनी आजच सभात्याग केला, असे किरण रिजिजू पत्रकार परिषदेत म्हणाले.

Waqf board सुधारणा बिलाला कोणत्या राजकीय पक्षाने विरोध केला आणि कोणत्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला याची नोंद संसदेच्या इतिहासात होणार आहे त्यामुळे सगळ्या सदस्यांनी आवर्जून संबंधित विधेयकाच्या चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन किरण रिजिजू यांनी पुन्हा केले. पण रिजिजू यांचे न ऐकताच विरोधकांनी आजच सभात्याग केला.

Waqf board सुधारणा कायदा आणण्यात मोदी सरकारचा इरादा गैर असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम आदी पक्षांच्या खासदारांचा समावेश होता.

Kiren Rijiju says, “In the Business Advisory Committee (BAC) meeting of Lok Sabha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात