विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट येणार ही शक्यता वर्तवली जात असतानाच कोरोना बाधितांची संख्या मात्र सातत्याने कमी होताना दिसून येत आहे. आणि ही एक चांगली बातमी आहे. नुकताच भारताने कोरोना विरोधात लढाईमध्ये आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. ते म्हणजे लसीकरणाच्या आकड्याने आज 99 कोटी डोसाचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतात तब्बल 99 कोटी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली आहे.
India reaches 99 crore mark in corona vaccination, says Union Health Minister Mansukh Mandvia on Twitter
“आपण 99 कोटींवर आहोत आणि 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी भारताची विक्रमी वाटचाल सुरू आहे” असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
We are at 99 crores 💉 Go for it India, continue to rapidly march towards our milestone of 100 crore #COVID19 vaccinations. pic.twitter.com/jq9NKnw8tF — Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) October 19, 2021
We are at 99 crores 💉
Go for it India, continue to rapidly march towards our milestone of 100 crore #COVID19 vaccinations. pic.twitter.com/jq9NKnw8tF
— Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) October 19, 2021
Corona Vaccination : दोन लसींचे मिश्र डोस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ; स्वीडनच्या शास्त्रज्ञाचे प्रयोग झाले यशस्वी
गेल्या 24 तासांत देशभरामध्ये 87,41,160 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोना रुग्ण संख्याही कमी होताना दिसून येतेय. तर देशात गेल्या 24 तासांमध्ये 13,058 इतके रूग्ण नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या मागील 231 दिवसां मधील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App