वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देश गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभर पराक्रम दिवस साजरा करत असताना केंद्रातील मोदी सरकारने अंदमान निकोबार परिसरातील 21 अनाम द्वीपांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. Honoring 21 Param Vir Chakra winners
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेल परिसरात झालेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे या द्वीपांना बहाल केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सर्व वरिष्ठ सेना अधिकारी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी वीर सावरकरांपासून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यापर्यंत आणि आदिवासी वीरांपर्यंत अनेक वीरांची नावे घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुभाष द्वीपावर आता भव्य स्मारक साकारण्याची घोषणाही त्यांनी केली. ज्या परमवीर चक्र विजेत्यांची नावे अंदमान निकोबार समूहातील अनाम द्विपांना दिली आहेत त्यांची नावे आणि माहिती अशी :
जिन 21 द्वीपों को आज नया नाम मिला है, उनके इस नामकरण में भी गंभीर संदेश छिपे हैं। ये संदेश है -एक भारत, श्रेष्ठ भारत का संदेश, देश के लिए दिए गए बलिदान की अमरता का संदेश, और भारतीय सेना के अद्वितीय शौर्य और पराक्रम का संदेश है: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/zAR50KadE9 — ANI_HindiNews (@AHindinews) January 23, 2023
जिन 21 द्वीपों को आज नया नाम मिला है, उनके इस नामकरण में भी गंभीर संदेश छिपे हैं। ये संदेश है -एक भारत, श्रेष्ठ भारत का संदेश, देश के लिए दिए गए बलिदान की अमरता का संदेश, और भारतीय सेना के अद्वितीय शौर्य और पराक्रम का संदेश है: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/zAR50KadE9
— ANI_HindiNews (@AHindinews) January 23, 2023
– परमवीर चक्र का देतात?
परमवीर चक्र हा भारतीय सैन्यामध्ये युद्धकाळात दाखवलेल्या शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. परमवीर चक्र हे शत्रूच्या उपस्थितीत दाखवलेल्या उल्लेखनीय साहसासाठी जिवंतपणी तसेच मरणोत्तर दिले जाते.
परमवीर पुरस्काराची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली व हे पुरस्कार देण्याची सुरुवात 15 ऑगस्ट 1947 पासून करण्यात आली. परमवीर चक्र हे जमिनीवर, हवेत किंवा समुद्रामध्ये शत्रू समोर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी तसेच आत्मत्यागाच्या पूर्वतयारीने दाखवलेले साहस आणि आत्मबलिदानासाठी दिले जाते.
आतापर्यंत 21 परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले 14 पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. 21 पैकी 20 पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत.
परमवीर पुरस्कार विजेते 21 जवान :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App