वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केले की ते लवकरच भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करतील.कांस्य,दगडाची शिल्पे,ऐतिहासिक छायाचित्रे अशा काही कलाकृती ज्या भारताच्या चोला काळाशी संबंधित आहे,परंतु त्या थेट न्यूयॉर्कच्या बदनाम झालेल्या कला विक्रेता सुभाष कपूर यांच्याकडून खरेदी केल्या गेलेल्या होत्या,ज्यांच्यावर आशिया खंडातून हजारो पुरातन वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप आहे.GREAT NEWS: Australia to return 14 culturally important artefacts to India; 13 of these were looted from India
India is grateful to Australia and NGA for their decision to return these extraordinary pieces of art to 🇮🇳@MEAIndia @dfat https://t.co/PTj93M3Rsm — India in Australia (@HCICanberra) July 29, 2021
India is grateful to Australia and NGA for their decision to return these extraordinary pieces of art to 🇮🇳@MEAIndia @dfat https://t.co/PTj93M3Rsm
— India in Australia (@HCICanberra) July 29, 2021
त्याचबरोबर दिवंगत व्यापारी विल्यम वोल्फकडून मिळवलेल्या कलाकृतीही परत केली जाईल.तसेच कपूरच्या बंद पडलेल्या मॅनहॅटन गॅलरी आर्ट ऑफ द पास्टमधून खरेदी केलेली अतिरिक्त तीन शिल्पे, पुढील संशोधन आणि पुनर्वसनासाठी काढून टाकण्यात आली आहेत, असे संग्रहालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संग्रहालयाचे संचालक ‘निक मिट्झेविच’ म्हणतात की ,ऑस्ट्रेलियातील संग्रहालयांनी याविषयांची सखोल पडताळणी करूनच शेवटी या कलाकृती भारताशी संबंधित आहेत आणि त्या गैर मार्गानेच विकल्या गेल्या होत्या त्यामुळे या कलाकृती भारताला परत देणे अनिवार्य आहे,हा निर्णय घेतला आहे. १९८९ ते २०१० या काळात गॅलरीने अधिग्रहित केलेलय कलाकृती या संयुक्तपणे ३.३३ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (२.२२३ दशलक्ष डॉलर्स) मध्ये खरेदी केली गेली होती.
या कलाकृतींची किंमत 3 दशलक्ष डॉलर्स आहे
या कलाकृती भारत सरकारला दिल्या जातील, ज्याची किंमत $ 3 दशलक्ष आहे. नॅशनल आर्ट म्युझियमकडून सांगण्यात आले की या सर्व कलाकृती चोरीनंतर तस्करीच्या माध्यमातून येथे पोहोचल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App