पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा दोन तृतीयांशहून अधिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला
विशेष प्रतिनिधी
श्रीहरीकोटा : चांद्रयान-3 ने पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा दोन तृतीयांशहून अधिक प्रवास पूर्ण केला आहे. चांद्रयान-३ शनिवारी संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत पोहोचले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मते, यानाची स्थिती परिपूर्ण आहे आणि सर्व काही व्यवस्थि सुरू आहे. GOOD NEWS about Chandrayaan 3 Reached the moon’ orbit ISRO informed
या प्रक्रियेला Lunar Orbit Injection (LOI) म्हणतात. यापूर्वी चांद्रयान-३ ने पृथ्वीच्या कक्षेत पाच फेऱ्या केल्या होत्या, ज्याद्वारे यान पृथ्वीपासून दूर पाठवले जात होते. आता शनिवारपासून ते प्रदक्षिणा घालत चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. सर्व काही अपेक्षेनुसार पार पडल्यास, 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल असे सांगितले जात आहे.
14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून या यानाने चंद्राच्या अंतराच्या दोन तृतीयांश अंतर कापले आहे. चांद्रयान-3 लाँच झाल्यापासून, पाच कक्षा वाढवण्याच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. याआधी 1 ऑगस्ट रोजी यानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने उचलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि यानाला ‘ट्रान्सलुनर ऑर्बिट’मध्ये ठेवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App