वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. लेफ्टनंट जनरल एल. निशिकांत सिंह यांनी गुरुवारी सकाळी ट्विट केले आणि राज्यातील परिस्थितीचे वर्णन सीरिया-लेबनॉन असे केले.Ex-Army Chief appeals, PM-Home Minister should intervene in Manipur case
त्यांनी लिहिले- ‘मी मणिपूरमधील एक सामान्य भारतीय आहे, जो निवृत्त जीवन जगत आहे. राज्य आता राज्यहीन आहे. जीवन आणि संपत्ती कोणीही, कधीही नष्ट करू शकते. जसे लिबिया, लेबनॉन, नायजेरिया, सीरिया येथे घडते. मणिपूर स्वतःच्या आगीत जळतंय, कोणी ऐकत आहे का?’
यावर चिंता व्यक्त करताना व्हीपी मलिक म्हणाले की, लष्कराच्या अधिकाऱ्याने असे बोलणे अत्यंत खेदजनक आहे. राज्यातील परिस्थितीकडे सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे.
मणिपूरमध्ये, कुकी आणि मेईतेई समुदायांमधील आरक्षणावरून झालेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या गणवेशात काही लोक राज्यात घुसू शकतात, असा दावा गुप्तचरांनी केला आहे. या लोकांनी एका टेलरला गणवेश शिवण्याची ऑर्डर दिली आहे.
इंटेलिजन्सचा दावा– लोक पोलिसांच्या गणवेशात राज्यात प्रवेश करू शकतात
देशाच्या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे की, काही लोकांनी पोलिस आणि कमांडोचे गणवेश बनवले आहेत, जेणेकरून त्यांचा हिंसाचार भडकावण्यासाठी वापर करता येईल, ही माहिती मणिपूर पोलिसांना देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा IB अहवाल राज्य सुरक्षा अधिकार्यांना पाठवण्यात आला होता, ज्यात असे म्हटले आहे की मोइरांग, बिष्णुपूर येथील एका टेलरला 15 जूनपर्यंत 500 मणिपूर पोलिस/कमांडो गणवेश शिवण्याचे कंत्राट देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App