विशेष प्रतिनिधी
बेंगलुरु : रॉयल चॅलेंजर्स बंधूंचा विजय साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या क्रिकेट प्रेमींमध्ये चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये 11 बळी गेले. त्यानंतर कर्नाटकात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना चिन्नास्वामी स्टेडियमवर नेमके किती पोलीस बंदोबस्ताला होते??, याचा आकडाच माहिती नसल्याचे समोर आले. Chinnaswamy Stadium
35 हजार क्षमतेच्या स्टेडियमवर आठ लाख लोक जमले, असा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. त्यावेळी तिथे 5000 हजार पोलीस बंदोबस्ताला होते, असा दावा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. प्रत्यक्षात तिथे 1000 पोलिसच बंदोबस्ताला होते, अशी माहिती कर्नाटक सरकारच्या वकिलांनी कोर्टात दिल्याने कर्नाटकचे काँग्रेस सरकार “एक्स्पोज” झाले.
IPL मध्ये RCB चा विजय साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियम वर लाखो लोक जमले. त्याची क्षमता फक्त 35000 ची आहे. पण तिथे आठ लाख लोक जमले असल्याचा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोकांचा बळी गेला. चेंगराचिंगरी किंवा बळी जाण्याचे समर्थन करायचे काही कारण नाही. पण तिथे 11 लोक बळी गेलेत. कुंभमेळ्यात शेकडो लोकांचा बळी जातो, असे सिद्धरामय्या म्हणाले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर 5000 पोलीस बंदोबस्ताला होते, असा दावा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. यावेळी ते कॅमेरासमोर रडले. परंतु चेंगराचेंगरी संदर्भात बेंगलोर हायकोर्टात दाखल झालेल्या केस मध्ये सरकारी वकीलांनी मात्र तिथे फक्त 1000 पोलीस बंदोबस्ताला होते, याची कबुली दिली. याचा अर्थ कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनाच नेमके किती पोलीस बंदोबस्ताला होते??, याची नीट माहिती नव्हती हे उघड झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App