बंगालमधील गुन्हेगारांना टीएमसीचे संरक्षण असल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये ईडीनंतर आता एनआयए टीमवरही हल्ल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजप नेते अमित मालवीय यांनी राज्यातील टीएमसी सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सरकारी यंत्रणांच्या पथकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे टीएमसी सरकारवर सर्वचस्तरातून टीका होत आहे.BJP strongly criticizes the Trinamool government due to the attack on the NIA team
अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ममता बॅनर्जींच्या कुशासनात पश्चिम बंगालमध्ये अराजकतेची परिस्थिती कायम आहे. ईडीवरील हल्ल्यानंतर आता आणखी एका केंद्रीय संस्थेवर हल्ला झाला आहे. पूर्व मेदिनीपूरच्या भूपतीनगरमध्ये एनआयए अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या दोन नेत्यांना अटक करण्यासाठी एनआयएची टीम पोहोचली होती. तेव्हा 100-150 गावकऱ्यांनी NIA टीमला आरोपींना अटक करण्यापासून रोखले नाही तर NIA च्या वाहनांवर दगडफेकही केली.
स्थानिक पोलिसांच्या संगनमताने हे शक्य होत नाही. बंगालमधील सर्व गुन्हेगार, शाहजहान शेख ते अनुब्रता मंडल, सर्वांना टीएमसीचे संरक्षण आहे. अमित मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दोन व्हिडिओही जारी केले आहेत, ज्यात एका व्हिडिओमध्ये स्थानिक लोक सुरक्षा दलांशी वाद घालताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये NIA टीमच्या ताफ्यावर दगडफेक करताना दिसत आहे.
बंगालमधील भाजप नेते राहुल सिन्हा यांनीही एनआय टीमवर हल्ला झाल्याबद्दल राज्यातील टीएमसी सरकारवर निशाणा साधला. सिन्हा म्हणाले की, ‘या हल्ल्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी राज्यकारभाराच्या नावाखाली हुकूमशाही करत आहेत, त्यांनी राज्याचे भवितव्य कट्टरवाद्यांच्या हातात दिले आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App